उद्यापासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार पैसे; पहा कोणत्या जिल्ह्याला शासनाची किती मदत ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी जुलै ऑगस्ट मध्ये राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र एकनाथ शिंदे सरकारने नव्या निकषांसह अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले. सरकारने राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागासाठी 3 हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यापैकी मराठवाडा विभागाकरिता 1106 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत

मराठवाड्याला मिळालेल्या मदतीचे वितरण उद्यापासून म्हणजेच गुरुवार (22) पासून केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टी, पुरासह गोगलगायमुळे तब्बल 10 लाख 81 हजार 761.18 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील जालना,परभणी, हिंगोली,नांदेड, लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नुकसानभरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे.

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्याला नुकसानभरपाईच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. विशेष औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतजमीन वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र असे असतानाही औरंगाबाद जिल्ह्याला नुकसानभरपाईमधून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोणत्या जिल्ह्याला किती मदत ?

जिल्हा  बाधित शेतकरी  बाधित क्षेत्र  अनुदान 
जालना  6898 2311.79 हेक्टर  3 कोटी 71 लाख 84 हजार 
परभणी  1557 1179 हेक्टर 1 कोटी 60 लाख 34 हजार 
हिंगोली  133970 113620 हेक्टर 157 कोटी 4 लाख 52 हजार 
नांदेड  741946 527491 हेक्टर 717 कोटी 88 लाख 92 हजार 
लातूर  49160 27425.37 हेक्टर 37 कोटी 30 लाख 83 हजार 
उस्मानाबाद  75739 66723.20 हेक्टर 90 कोटी 74 लाख 36 हजार 
error: Content is protected !!