हॅलो कृषी ऑनलाईन : ऐन हंगामात रोहित्र जळाले की शेतकऱ्यांना सिंचनासाठी (Agriculture Electricity) मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना आला की शेतीसाठीच्या विजेचा वापर वाढून रोहित्र जळाल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. मात्र आता जळालेल्या रोहित्राच्या जागी दुरुस्त केलेले रोहित्र बसविण्यास (Agriculture Electricity) विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या ॲपचा वापर करून तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
रोहित्र जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी तीन दिवसांत दुरुस्त रोहित्र बसविण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. जळालेल्या रोहित्राच्या जागी दुरुस्त रोहित्र बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणकडून (Agriculture Electricity ट्रान्सफॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त रोहित्राचा साठा तयार करणे, असे विविध उपाय केले आहेत. रोहित्र बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालय स्तरावर रोज घेण्यात येत आहे. या मोहिमेला यश आले असून महावितरणला रोहित्र बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसात रोहित्र बदलण्यात येत आहे. असेही महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
‘अशी’ करा तक्रार (Agriculture Electricity Mahavitaran App Complaint)
मोबाईलवर महावितरण हे ॲप उघडा ‘नादुरुस्त रोहित्राची माहिती कळवा’ या बटणावर क्लिक करा. ग्राहकाचे नाव नंबर दिसेल त्यावर क्लिक करा. ट्रान्सफॉर्मरजवळची खूण कोणती आहे. कधीपासून रोहित्र बंद आहे आणि कोणता बिघाड दिसतो याची माहिती भरा. संबंधित ट्रान्सफॉर्मरचा फोटो काढून अपलोड करा. नोंद करा किंवा सबमिट हे बटण दाबा. ट्रान्सफॉर्मरची तक्रार नोंदविली जाईल. त्याची नोंद थेट महावितरणच्या मुख्य सर्व्हरमध्ये होईल. तातडीने दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे सूचना दिली जाईल. ट्रान्सफॉर्मर बदलला की, त्याची माहिती ग्राहकाला एसएमएसद्वारे दिली जाईल. अशी माहितीही महावितरणने दिली आहे.