Friday, February 3, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

जळगावात केळी पिकावर रोग; शेतकऱ्यावर रोपे उपटून टाकण्याची वेळ

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
September 14, 2022
in बातम्या
banana grower
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे संकट कमी होण्याचे नाव घेत नाहीये. सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. त्यानंतर उत्पादनात घट झाली. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील केळी बागेवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी काही शेतकऱ्यांना केळीची रोपे उपटून फेकून द्यावी लागली आहे.यापूर्वी केळीचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

वास्तविक, जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात केळीचे सर्वाधिक पीक घेतले जाते. येथील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे मुख्य पीक केळी आहे. जळगावची केळी महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर प्रसिद्ध आहे. केळीची चव आणि चांगले उत्पन्न यामुळे येथील शेतकरीही संपन्न झाला आहे. मात्र यंदा जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कधी निसर्गाच्या अवकृपेमुळे तर कधी रोगराईच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

औषध फवारणीचा खर्च

केळी पिकावरील कीड, रोग नियंत्रण, सीएमव्ही रोग यावर आतापर्यंत योग्य संशोधन झालेले नाही. केळी पिकात सीएमव्ही रोग प्रतिबंधक औषधेही लवकर उपलब्ध होत नाहीत आणि फवारणीसाठी औषधे उपलब्ध असली तरी ती खूप महाग असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत आर्थिक नुकसान होते. केळीचे संशोधन अद्याप सुरू असले तरी, कीटक, सीएमव्ही रोग, यापासून मुळापासून मुक्त होण्यासाठी रामबाण औषध तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. पण, हे तंत्रज्ञान किती काळात अस्तित्वात येईल, याची माहिती नसल्याने केंद्र व राज्य सरकार याबाबत कठोर भूमिका का घेत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील गोकुळ धनू पाटील या शेतकऱ्याने आपल्या तीन एकरातून केळीच्या चार हजार रोपांची लागवड केली होती. केळीची लागवड होताच काही दिवसात बागांवर काकडी मोझॅक विषाणू नावाचा रोग वाढल्याने पिके नष्ट होत होती. यानंतर शेतकरी नाराज झाला आणि त्याने रोप उपटून बांधावर फेकले. त्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

 

 

Tags: Banana GrowersDisease on bananaJalgaon
SendShareTweet

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group