दिलासादायक ! नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ; नक्की किती मिळणार मदत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना आता शिंदे-फडणवीस सरकारकडून दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली असून महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे.

आता नक्की किती मिळणार रक्कम ?

बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून पीके आणि शेतजमिनीच्या नुकसानीसाठी 222 कोटी 32 लाख 45 हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. शासन निर्णय झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. या शासन निर्णयानुसार जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रुपयांऐवजी आता 13 हजार 600 रुपये मिळणार आहे. तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 ऐवजी आता 27 हजार रुपये मिळणार आहेत. बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी आता मिळणार 36 हजार रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरकारने मर्यादाही वाढवली आहे. दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टरपर्यंत शेतकर्याना मदत दिली जाणार आहे.

कधी मिळणार रक्कम ?

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत काढण्यात आलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. या शासन निर्णयानुसार संपूर्ण रक्कम बीम्स प्रणालीवर वितरीत करण्यात येत असली तरी लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तीय शिस्तीच्या दृष्टिकोनातून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करुन त्यानंतरच शासन निश्चित करेल, अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम हस्तांतरीत केली जाईल.

error: Content is protected !!