हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूरसह सांगली जिल्ह्यात सध्या दुष्काळाची (Drought) भीषण परिस्थिती आहे. अशातच हातातील फळबागा जपण्यासाठी शेतकरी अतोनात प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच नीरा उजवा कालव्याचे सुरु झालेले पाणी अचानक बंद झाले. ज्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने आपल्या दीड एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. नीरा उजवा कालव्यात फलटण भागात गळती झाल्याने, सुरु असलेले पाण्याचे आवर्तन बंद करण्यात आले आहे. ज्यामुळे या शेतकऱ्याने द्राक्ष बाग (Drought) तोडण्याचे हे टोकाचे पाऊल उचलेले आहे.
दीड एकर द्राक्ष बाग तोडली (Drought In Maharashtra)
समाधान ढोणे असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील रहिवासी आहेत. दरम्यान, कालवा दुरुस्तीनंतर पुन्हा आवर्तन देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, दुष्काळामुळे (Drought) द्राक्ष बाग जळू लागल्याचे पाहून संतापलेल्या शेतकऱ्याने आपल्या द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली आहे. दीड एकर द्राक्ष बाग तोडल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
… ही वेळ आली नसती
सध्या प्यायलाही पाणी नाही, अशावेळी भाटघरचे पाणी आले असते. तर आपल्याला ही बाग तोडायची वेळ आली नसती असे शेतकरी समाधान ढोणे यांनी म्हटले आहे. आता यातून उत्पन्न यायला पाच वर्षे जाणार असून, या बागेसाठी सात ते आठ लाखांचा खर्च केला होता, असेही ढोणे म्हणाले आहे. अगदी गरजेची वेळ असताना शेतकरी पाण्याची वाट पाहत होते. गावात गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषण सुरु झाले आहे. या सर्व निराश मानसिकतेमधून आपण द्राक्ष बाग तोडली आहे.
उजनीची पाणीपातळी चिंताजनक
परिणामी, सध्या दुष्काळाची दाहकता अजून वाढत असताना पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना वेळेवर पाणी द्यावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. दरम्यान, उजनी धरणात सध्या केवळ मायनस 44 टक्के म्हणजेच 37.71 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पाणीसाठ्यात 20 मे पर्यंत मोठी घट होईल, असे सांगितले जात आहे. मॉन्सून सुरु झाल्यानंतर म्हणजेच जूनमध्ये उजनी धरण क्षेत्रात वेळेत पाऊस सुरु झाला नाही तर पाण्याची परिस्थिती आणखीनच चिंताजनक होण्याची शक्यता आहे.