हरभऱ्यावरील मर,आणि माव्याचे कसे कराल व्यवस्थापन ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, सध्या बदलत्या वातावरणामुळे वावरातल्या पिकांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. राज्यातील अनेक भागात रब्बीतील मुख्य असलेल्या हरभरा पिकावर मावा आणि मर, तसेच घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आजच्या लेखात आपण हरभऱ्यावरील मर आणि मावा यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेऊया…

१) मर

मर रोग फ्युजाहियम ऑक्सिस्पोरम बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमीन मधुन आणी बियाव्दारे होतो. हा झाडाची अन्नद्रव्य वाहून घेऊन जाणाऱ्या पेशीला मारतो. मर रोगाची बुरशी 6 वर्षापर्यंत जमीन जिवंत राहू शकते. पण ज्या भागात हवामान जादा थंड राहते तेथे याचा प्रार्दुभाव कमी दिसतो.

लक्षणे

–झाडाचा जमिनी वरचा भाग, देठ आणी पाने सुकतात व झाड वाळून मरतात.
–कोवळी रोप सुकतात.
–जमिनी खालचा खोडाच्या भागाचा रंग कमी होतो.
–रोगग्रस्त झाडाच्या खोडांना उभा छेद दिल्यास फिकट तांबुस काळसर रंग दिसून येतो.

व्यवस्थापन

–वेळेवर पेरणी करावी.
–मोहरी किंवा जवस आंतरपिक म्हणून घ्यावेत.
–रोग प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा.
–पीकेव्ही, हरिता, बीडी एन जी 797, दिग्विजय, जे एस सी 55

शिवाय सध्या हरभरा पिकात मानकूजव्या आणि मर यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी किंवा बायोमिक्सची आळवणी करावी. बायोमिक्सच्या आळवणीसाठी पंपाचा नोझल काढून 200 ग्रॅम (पावडर) / 200 मिली (लिक्वीड) प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.

बीजप्रक्रिया

3 ग्राम कार्बेन्डाझिम (बाविस्टीन) किंवा कारबॉक्सिन + 2 ग्राम थायरम + 4 ग्राम ट्रायकोडेना व्हायरिड / किलो बियाणे

२)मावा (अपीस क्रॅसीव्हरा)

हा किडा फार कमी प्रदेशात अढळुन येतो.

लक्षणे

काही प्रदेशात उशारी पेरणी केल्या नंतर याचा प्रादुर्भाव होतो.
ही किड कोवळ्या फांद्या आणि घाटे यांच्यातला अर्क पिवुन घेते त्यामुळे फांद्या सुकतात आणि दाणे लहानच राहतात.

व्यवस्थापन

पेरणीनंतर आणि आधि शेतात स्वच्छता ठेवणे.
मित्र किटकांचा उपयोग करने.

error: Content is protected !!