Havaman Andāj : राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे तर अजूनही राज्यातील काही भागात पावसाने दडी मारली आहे. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट घोंगावत आहे. जुलै महिन्यातील पंधरा दिवस संपले आहेत तरी देखील म्हणावा सता पाऊस न झाल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. (Weather Update)
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढचे चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आव्हान देखील करण्यात आले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी या बातमीने दिलासा मिळाला आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ स्वरूपाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे लवकरच पाऊस होईल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. सातारा, नाशिक, सोलापूर, नंदूरबार, ठाणे आणि पालघर हे जिल्हे वगळता अन्य सर्व जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट जरी करण्यात आला आहे. (Havaman Andaj )
हवामान अंदाज कुठे पाहणार?
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला दररोजचा हवामान अंदाज पहायचा असेल तर आत्ताच प्लेस्टोअरवर जा आणि Hello Krushi हे अँप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. या अँप मध्ये तुम्ही तुमच्या गावात कधी पाऊस पडणार याची देखील माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर फक्त हवामान अंदाजच नाही तर, बाजारभाव, सरकारी योजना, जमीन मोजणी, पीक व्यवस्थापन, सातबारा व भू-नकाशा इत्यादींबद्दल तुम्ही माहिती पाहू शकतात. त्यामुळे लगेचच आपले Hello Krushi हे अँप इंस्टाल करा.
पाऊस नसल्याने पेरण्या बाकी
बऱ्याच ठिकाणी पाहिजे तेवढा पाऊस झाला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी सुरवातीला पाऊस झाला की लगेच पेरण्या केल्या होत्या आता त्या शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. पेरणीनंतर पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्या देखील पावसाअभावी हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.