Havaman Andaj : मागच्या काही दिवसापासून राज्यासह देशभरात तुफान पाऊस होत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाल्यांना पूर देखील आले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान अजून पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
त्याचबरोबर आज पुण्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी देखील अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यासोबतच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पालघर, सातारा या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई आणि ठाणे या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे (Havaman Andaj)
कोल्हापूर मध्ये पावसाचे थैमान
मागच्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होत आहे. नदी नाले ओसांडुन वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. पंचगंगा नदीने पहाटे तीन वाजता धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. तसेच कामाव्यतिरिक्त नागरिकांनी घराबाहेर पडू नये अस देखील सांगण्यात येत आहे
शेतकरी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी Hello Krushi असे एक ॲप बनवल आहे. यामध्ये तुम्ही रोजचा हवामान अंदाज चेक करू शकता. हे ॲप खास आम्ही शेतकऱ्यांसाठी बनवले आहे. शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा म्हणून आम्ही बनवले आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेच प्ले स्टोअर वर जाऊन आपलेHello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा. यामध्ये तुम्हाला कृषीविषयक नवनवीन माहिती मिळेल त्यामुळे लगेचच हे ॲप इंस्टॉल करा.