Havaman Andaj : जून महिन्यामध्ये मान्सून उशिरा दाखल झाला. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये पाऊस काही प्रमाणात बरसला मात्र ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेला आहे. ऑगस्टमध्ये पावसाने चांगली दडी मारली यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे . त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या दोन-तीन दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामाना विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
उत्तर बंगालच्या उपसागर मध्ये चक्राकार वारे तयार होत असून या वाऱ्यांच्या प्रभावामुळे हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टी लगत आजपासून पावसाचा जोर देखील वाढणार आहे.
इथे चेक करा दररोजचा हवामान अंदाज
शेतकरी मित्रांनो तुम्हाला दररोजच्या दररोज हवामान अंदाज चेक करायचा असेल तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या अँपच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या गावांमध्ये कधी पाऊस पडणार याबाबतची देखील माहिती अगदी अचूकपणे मिळेल त्यामुळे लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन हे ॲप तुमचा मोबाईल मध्ये इंस्टाल करा. सध्या दोन २ शेतकरी याचा लाभ घेत आहे त्यामुळे तुम्ही देखील या ॲपचा फायदा घ्यावा.
त्याचबरोबर पुण्यासह नाशिक, सातारा जिल्ह्यातील घाट माथा भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केला आहे. भंडारा, वर्धा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला आहे. दरम्यान मागच्या महिन्यापासून पावसाने राज्यभरात चांगली दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची खरी पिके करपू लागली आहेत. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलं आहे. अनेक ठिकाणी तर पिण्याच्या प्राण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर मुसळधार पाऊस व्हावा अशी अशा शेतकऱ्यांना लागली आहे.
धरणांमधील पाणीसाठा अद्यापही कमीच
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी धरणांमध्ये पाणीसाठा खूपच कमी आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने धरणातील पाण्याची पातळी खूप कमी झाली आहे. यामुळे नागरिक मोठ्या चिंतेत आहेत आगामी काळात जर पाऊस झाला नाही आणि धरणातील पाणी पातळी वाढली नाही तर पाणी टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.