हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक वारंवार मागणी करताना तसेच भूमिका मांडताना दिसत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील आज पत्रकारांशी बोलताना नुकासनग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात सरकारच्या भूमिकेबाबत आज सभागृहात चर्चा होणं अपेक्षीत आहे. शेतकऱ्यांच्या मदतीच्या संदर्भातील मुद्दा सभागृहात उपस्थित केला असल्याचे ते म्हणाले.
याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर चांगली भरीव मदत सरकारनं द्यावी गोगलगायमुळं शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे अतोनात नुकसान झालं आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील मदत करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी आधिवेशनादरम्यान सभागृत उपस्थित केलेल्या मुद्द्यांबद्दल त्यांनी सांगितले. ते म्हणाले, गोगलगायची लक्षवेधी सभागृहात लागली होती. त्याबाबत अनेक सदस्यांनी भूमिका मांडली आहे. त्यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी भूमिका अजित पवारांनी मांडली. अतिवृष्टीनं, सोयाबीन, कापूस याचे मोठं नुकसान झालं आहे. तसेच अनेक ठिकाणचे रस्ते, पूल वाहून गेले असल्याचे अजित पवार म्हणाले.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पहिली पेरणी, दुसरी पेरणी वाया गेली आहे. या नुकसानीबाबत आम्ही सभागृहात भूमिका मांडली आहे. पण सरकार आज याबाबात काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचे ठारणार आहे. सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरिव मदत करावी अशी आमची मागणी असल्याचे अजित पवार म्हणाले.