मृत कुळांच्या जमिनी आता त्यांच्या वारसांनाही विकता येणार; आठवडाभरात सुरु होणार नोंदणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मृत कुळांच्या वारसांच्या नोंदी नसल्याने त्यांना जमिनींच्या मालकी हक्कापासून वंचित रहावे लागत होते. मात्र आता या वारसांच्या नोंदी कब्जेदार हक्का अंतर्गत होणार असल्याने त्यांना मालकी हक्क मिळवून महसूल नजराना भरल्यास जमिनीची विक्रीही करता येणार आहे. येत्या आठवडाभरात ही नोंदणी सुरू होणार आहे.

ई फेरफार प्रणाली सुरू झाल्यानंतर इतर हक्कांमधील कुळांच्या वारसांच्या नोंदी केल्या जात नव्हत्या त्या नोंदी करण्यासाठीची तरतूद प्रणालीत नव्हती. याबाबत असे लक्षात आले की कब्जेदार सदराच्या नोंदी करता येतात मात्र कुळांच्या वारसांची नोंद करता येत नाही. कब्जेदार सदराच्या नोंदी करताना महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याअंतर्गत वारसा प्रकरणांची नोंदवही अद्यावत करावी लागते. त्यानंतर त्यावर वारसांची नोंद केली जाते मात्र ही प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी आहे. त्यातही एकच बाब नोंदवताना दोन वेळा करावी लागत होती. त्यामुळे जमाबंदी आयुक्तालयाने राज्य सरकारला एक प्रस्ताव पाठवला त्यात कब्जेदार सदराच्या नोंदी वारस नोंदीनेच करण्याची मुभा द्यावी त्यामुळे वारसा प्रकरणांच्या नोंदवहीची गरज भासणार नाही असं मांडण्यात आलं. ही वारसा प्रकरणांची नोंदवही सध्याच्या ई फेरफार प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर करून ऑटो जनरेट करता येईल. त्याच पद्धतीने कुळासाठीही वारस नोंद करावी असा विचार पुढे आला.

कुळ वहिवाट कायदा आणि महाराष्ट्र जमीन महसूल कायदा याचा अभ्यास केला असता त्यात कुळांसाठी वारसा प्रकरणांची नोंदवही करावी असे कुठेही नमूद नाही किंवा तसे बंधनकारकही नाही त्यामुळे वारसांची नोंद थेट करू शकतो. त्यानुसार येत्या आठवडाभरात राज्यभरासाठी वारसा प्रकरणाची नोंदवही कार्यरत केली जाणार आहे. त्यानुसार मृत कुळांच्या वारसांची नोंद करता येणार आहे.

वारसांना अशी विकता येईल जमीन

मृत कुळांच्या वारसांना थेट जमीन विकता येत नाही मात्र सातबारावर नोंद झाल्यानंतर कुळ कायदा कलम 43 प्रमाणे वारसाला मालक होता येईल त्यानंतर त्यासाठीचा जमिनीच्या आकाराचा 40 पट महसूल नजरांना भरून ती विकता ही येईल वारसांच्या नोंदी करण्यातील ही एक महत्त्वाची पायरी आहे.

याबाबत माहिती देताना राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्पाच्या सरिता नरके यांनी सांगितलं की जी व्यक्तीमृत आहे त्याच्या नावाने कोणताही व्यवहार करू शकत नाही. अशा परिस्थितीत वारस नोंद करणे थांबले होते आता या प्रक्रियेमुळे वारसांच्या नोंदी होणार आहेत.

error: Content is protected !!