हॅलो कृषी ऑनलाईन : कृषीमंत्री पदाची घोषणा होताच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी कामाला सुरुवात केली आहे. मंत्रिपदाची घोषणा झाल्यावर दुसऱ्याच दिवशी जालना येथे मराठवाडा विभागाची बैठक बोलावून त्यांनी आढावा घेतला. त्यांनतर आता आठवड्यातून एक दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचं सत्तार म्हणाले आहेत.
या बैठकीदरम्यान कृषी विभागांच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने आठवड्यातून एक दिवस सर्व अधिकाऱ्यांसह शेताच्या बांधावर जाण्याचा निर्णय घेवून याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचं सत्तार म्हणाले आहेत. यावेळी बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले, “शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मी आणि माझ्या खात्याचे अधिकारी दर आठवड्यात एका गावात जाणार आहोत. त्या गावात गेल्यावर शेतकऱ्यासोबत एक दिवस घालून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत जाणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या समस्या कळणार नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याच अब्दुल सत्तार म्हणाले आहे.
याबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकर्यांच्यावर आत्महत्येचीवेळ का येते याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सत्तार म्हणाले…