PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खूशखबर! ‘या’ तारखेला जमा होणार 13 व्या हप्त्याचे पैसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत आत्तापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले असून गेल्या काही दिवसांपासून शेतकरी 13 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र आता लवकरच या हप्त्याच्या माध्यमातून 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. हे पैसे नेमके कधी जमा होणार याबाबतची माहितीही केंद्रातील मोदी सरकारने जाहीर केली आहे.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंडलाजे यांनी याबद्दल सांगताना म्हंटल की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारी रोजी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतील. या हप्त्याद्वारे केंद्र सरकार 9 कोटी शेतकऱ्यांना एकाच वेळी 18 हजार कोटी रुपये देणार आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2022 मध्ये मोदींनी 12 व्या हप्त्याच्या रूपाने 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले होते.

शेतकरी मित्रानो, तुम्हालाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्या. हॅलो कृषी मध्ये पीएम किसान योजनेच्या संबंधित सर्व माहिती तर मिळतेच याशिवाय मोदी सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी अवघ्या काही मिनिटात तुम्ही अर्ज सुद्धा करू शकता. या व्यतिरिक्त हॅलो कृषी अँप मध्ये तुम्हाला जमीन मोजणी, सातबारा उतारा, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतात. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व तुम्हाला अगदी मोफत मध्ये मिळत आहे. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोर वर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

काय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना –

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही मोदी सरकारची अतिशय नावाजलेली योजना म्हणता येईल. 24 फरवरी 2019 रोजी ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकार कडून करण्यात येते. २००० रुपयांच्या एकूण ३ हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येते. आत्तापार्यंत या योजनेचा लाभ देशभरातील अनेक शेतकऱ्यांना झाला आहे.

error: Content is protected !!