Pomegranate Crop : सध्या राज्यभर पावसाने चांगली दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअभावी खरीप पिके सुकू लागले आहेत तर फळबागा देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शेतकरी फळबाग जगवण्यासाठी टॅंकरने विकत पाणी घेऊन फळबागेला देत आहेत. तर काही शेतकरी आपल्या पिकांना तांब्याने पाणी देत असल्याचे चित्र सध्या राज्यभर पाहायला मिळत आहे. जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या असून पिकांना वाचवायचं कसं? असा प्रश्न मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे असे शेतकरी पिकाला पाणी देत आहेत. मात्र काही ठिकाणी सिंचन नसल्याने पीक वाचवण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात देखील मागच्या तीन महिन्यापासून जास्त पाऊस पडलेला नाही त्याचबरोबर उष्णतेचे देखील मोठे प्रमाण वाढले आहे. यामुळे वाढत्या उष्णतेपासून डाळिंब बाग वाचवण्यासाठी शेतकरी वेगवेगळी कृती करून आपली फळबाग वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
डाळिंबावर कापडी अच्छादन – शेतकऱ्याची अनोखी शक्कल
डाळिंब बाग वाचवण्यासाठी सांगोला तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबावर कापडी अच्छादन टाकले असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे डाळिंब बागांचे संरक्षण केले आहे. सध्या राज्यभर पावसाने दडी मारली आहे त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून उष्णतेचे देखील प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाढत्या तापमानामुळे डाळिंबावर काळे डाग येण्याचा धोका वाढला आहे त्याचबरोबर इतर रोग देखील डाळिंब फळावर येण्याची शक्यता आहे त्यामुळे या उष्णतेपासून डाळिंबाचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी शक्कल लढवली आहे. सध्या शेतकऱ्याची परिसरात चर्चा होत आहे.
कपाशीचे होते सर्वात जास्त नुकसान
बऱ्याच शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये कपाशीची लागवड केली होती आता ही कपाशी फुल आणि कैरी लागण्याच्या बहारात आहे. मात्र यावेळी कैरी परिपकव् होण्यासाठी पाण्याची जास्त गरज असते. मात्र अशा ठिकाणी कपाशीला पुरेसे पाणी मिळत नसल्याने पावसाअभावी बहार वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर पुरेशा पाण्याअभावी फुलपाती लागलेल्या झाडांची वाढ खुंटते आणि पाणी न मिळाल्यामुळे फुलपातीची गळती देखील सुरू होत आहे. त्यामुळे कपाशीचे सर्वाधिक नुकसान होत असल्याचे दिसत आहे. यामुळे यंदा कापूस उत्पादनात घट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे