Profit Making Crop : ‘या’ पिकाच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना मिळेल मोठा नफा, 4 महिन्यात 4 लाख कमवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । कृषी क्षेत्रात (Agriculture Sector) भारताचा जगात दबदबा आहे. (Profit Making Crop) आपल्या देशातील अनेक पिकांना जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाहेरील देशांत मागणी जास्त असल्याने केंद्र सरकारही (Union Government) अनेक शेतमाल निर्यात करते. आज आपण अशाच एका पिकाबाबत माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून शेतकरी बक्कळ पैसे (Profit) कमावू शकतात. तसेच ज्याची परदेशात खूप मोठी मागणी असल्याने निर्यातीतून (Export Facility) मोठा नफा कमावण्याची संधी शेतकऱ्यांना आहे.

यापूर्वी अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

आज आपण रताळ्याच्या शेतीबाबत (Sweet Potato Farming) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. रताळे उत्पादक शेतकरी देशभरात आहेत परंतु अद्याप अनेक शेतकरी रताळे मोठ्या प्राणावर घेताना दिसत नाहीत. मशागतीचा त्रास अन पीक काढताना लागणारी मेहनत यामुळे शेतकरी रताळ्याच्या शेतीकडे दुर्लक्ष करतात. मात्र योग्य नियोजन अन व्यवस्थापन कौश्यल्याने रताळ्यातून बक्कळ पैसे शेतकरी कमावू शकतो.

रताळे निर्यातीत भारत ६ व्या क्रमांकावर (Sweet Potato farming)

भारतातील रताळ्याना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. रताळे जगातील अनेक देशांमध्ये निर्यात केले जातात. रताळे निर्यातीत भारत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. वाढती निर्यात पाहता भारत सरकारही याला प्रोत्साहन देत आहे. केंद्र सरकार ज्या पद्धतीने रताळ्याला प्रोत्साहन देत आहे यामुळे आगामी काळात भारत रताळे निर्यातीत प्रथम क्रमांकावर येऊ शकतो.

रताळे लागवडीसाठी माती कशी असावी?

रताळ्याच्या चांगल्या उत्पादनासाठी योग्य मातीची निवड करणे आवश्यक आहे. जर रताळ्याची लागवड करण्याचा विचार करत असाल तर माती फार कठीण आणि खडकाळ नसावी. जेथे पाणी साचले आहे अशा ठिकाणी शेती करू नका. मातीचे pH मूल्य 5.8 ते 6.8 दरम्यान असावे. तसेच पाण्याचा योग्य निचरा होणे आवश्यक आहे. रताळी लागवडीसाठी साधारण उतार असलेली व उत्तम निचऱ्याची जमीन या पिकाच्या लागवडीसाठी निवडावी. टेकडीच्या उतारावरील वरकस जमिनीत हे पीक घेता येईल. लागवडीकरिता जमिनीची चांगली मशागत करावी. साधारणपणे 60 सें.मी. अंतरावर वरंबे जमिनीच्या उतारास काटकोनात करावेत. लागवड करण्यासाठी कोकण अश्‍विनी, वर्षा किंवा श्रीवर्धनी या जातींचा वापर करावा. पावसाळी पिकाची लागवड जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण करावी.

रताळे कधी पेरायचे?

रताळ्याच्या उत्पादनासाठी, 25,000-30,000 कट वेली किंवा 280-320 किलो कंद प्रति एकर आवश्यक आहेत. जानेवारी-फेब्रुवारी, एप्रिल ते जुलै महिन्यात पिकांची पेरणी केली जाते. चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या खतांचा वापर केला जातो. वेळेवर सिंचन करावे लागते. शेणाचा वापर सेंद्रिय खत म्हणून केला जातो. रताळ्याच्या लागवडीसाठी स्फुरद, नायट्रोजन यांचाही वापर केला जातो.

रताळी किती दिवसांनी काढायला येतात?

लागवडीनंतर सुमारे साडेतीन ते चार महिन्यांनी पाने पिवळी पडू लागल्यानंतर रताळ्याची काढणी करावी. रताळी काढण्यास तयार झाली, हे पाहण्यासाठी काही रताळी सुरीने कापली असता जो पांढरा चीक बाहेर येतो, तो वाळल्यानंतर पांढऱ्या रंगाचाच राहिला पाहिजे. त्या चिकास काळसर किंवा हिरवट रंग आल्यास रताळी काढण्यास तयार नाहीत, असे समजावे. प्रति हेक्‍टरी सुमारे २० टन रताळी मिळता

रताळ्याच्या लागवडीतून किती उत्पन्न मिळते

रताळ्याची शेती खूप फायदेशीर आहे. यातून प्रति हेक्टर शेतकरी १५ ते २० टन रताळ्याचे उत्पादन सहज घेऊ शकतात. सध्या रताळ्याचा १५०० ते ३००० हजार प्रति क्विंटल भाव सुरु आहे. यानुसार १ हेक्टर क्षेत्रातून केवळ चार महिन्यात शेतकरी ४ लाख रुपये कमावू शकतो.

error: Content is protected !!