हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अद्यापही राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचा ऊस गाळपाविना शिल्लक आहे. दरवर्षी हा गाळप हंगाम साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरु होतो. हा हंगाम एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत चालतो. मात्र यंदाच्या वर्षी उसाच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. अद्यापही राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील ऊस गाळपाविना रानात उभा आहे. महाराष्ट्रात अद्याप 17.5 लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
बीड जिल्ह्यातही अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथील शेतकरी रवींद्र ढगे यांनी आपल्या कुटुंबासह रस्त्यावरच आंदोलन सुरु केले आहे. त्यांनी घरातील सर्व सामान देखील रस्त्यावर आणले आहे. साखर कारखान्याकडून अद्यापही त्यांच्या उसाची उचल केली गेली नाही. अंबाजोगाई तालुक्यातील रवींद्र ढगे हे गेल्या 30 दिवसांपासून कारखान्याला ऊस देण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मात्र साखर कारखान्याकडून पीक नेले जात नाही. उच्च जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या आदेशानंतरही गिरणी मालक ऊस घेण्यास तयार नसल्याचा आरोपही ढगे यांनी केला आहे.
शेतकऱ्याने केली आत्महत्या केली
मराठवाड्यातील बीड, लातूरसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जादा उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही दिवसांपूर्वी गेवराई येथे एका तरुण ऊस उत्पादक शेतकऱ्याने दोन एकर उसाचे पीक जाळून आत्महत्या केली होती. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर अनेक शेतकरी संघटना देखील आक्रमक झाल्या होत्या.
महाराष्ट्र सरकारने काय निर्णय घेतला?
1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रुपये 200 प्रती टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात आला. शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.