संत्री-मोंसबीतील फळगळ व फळसडीमागच्या ‘या’ अज्ञात शत्रुला वेळीच आवरा नाहीतर होईल मोठ नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: संत्रा, मोसंबी व इतर फळपिकांमधील फळगळ व फळसडी होण्यामागे फळमाशी कारणीभूत असते. फळमाशीच्या प्रादुर्भावा संबधित देश- विदेशातील विविध विद्यापिठांच्या संशोधनानुसार संत्रा तसेच इतर फळपिकांमध्ये ४०-८०% नुकसान एकट्या फळमाशीमुळे होत असल्याचे सिद्ध झाले आहे.
फळमाशीवर कोणत्याही प्रकारचे औषध उपलब्ध नाही. याच कारणामुळे फळं परिपक्कवतेच्या काळात संपुर्ण बागेत फळगळ व फळसड झाल्याचे पहायला मिळते. मात्र त्यावेळी यावर कोणताही मार्ग न सापडल्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे पहायला मिळते.

यावर उपाय काय ?

पहिल्या पावसानंतर म्हणजे जुन महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी फळमाशीचे सापळे आपल्या शेतात लावावेत. एकरी ९ ते १० सापळे लावण्याचा सल्ला कृषी तज्ञांकडून दिला जातो. त्यामुळे फळमाशीवर आटकाव घालता येऊन मोठं नुकसान टाळता येत. हे सापळे बाजारात स्वत दरात उपलब्ध असून कमी खर्चात जास्त प्रभावी उपात करता येतो.

Leave a Comment

error: Content is protected !!