शेतकरी प्रतीक्षेत, मान्सूनचे आगमन लांबले..! ‘या’ दिवशी धडकणार केरळात

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सूनचे केरळमधील आगमन अखेर लांबले आहे. त्यामुळे मान्सूनची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. यंदा मान्सून 31 मे रोजी केरळात पोहोचणार होता मात्र वाऱ्याची गती मंदावल्याने तो आता येत्या गुरुवारी पोहोचेल. असा नवा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी जाहीर केला. दरम्यान राज्यात मान्सून पूर्व पावसाचा जोर वाढणार आहे. … Read more

शेतकऱ्यांपुढे मोठं संकट ! एकीकडे कोरोना, दुसरीकडे साथीच्या रोगांमुळे 150 दुभत्या जनावरांचा मृत्यू

cattle

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक लोकांचे कोरोनाने जीव गेला. आता केवळ माणसांनाच नव्हे तर जनावरांना सुद्धा साथीच्या रोगाने विळखा घातला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घटसर्प, थायरेलेलीस सदृश्य साथीच्या आजाराने थैमान घातले असून त्यामुळे १५० जनावरांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे साथीच्या रोगाने दुभती जनावरे दगावत असल्याने … Read more

शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4000 रुपये, 30 जूनपूर्वी करा नोंदणी

State Budget 2021

हॅलो कृषी ऑनलाईन : 14 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM किसान )प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योजनेचा आठवा हप्ता 2000 रुपये जमा केला. देशातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. या योजनेकरिता आतापर्यंत नऊ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी केली आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! मान्सून 31 मे ला केरळात तर ‘या’ तारखेला महाराष्ट्र व्यापणार

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : खरिपाची तयारी करत असलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना आता वेध लागले आहेत मान्सूनचे. भारतीय हवामान खात्याने नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी मान्सून एक जून रोजी केरळमध्ये दाखल होईल असं सांगितलं होतं. मात्र मान्सून वर या चक्रीवादळाचा सकारात्मक परिणाम झाल्याने या वर्तवलेल्या … Read more

औरंगाबादेत पाऊस, कच्च्या घरांचं, शेती-फळ पिकांचं नुकसान

Unseasonal Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘यास’ चक्रीवादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रावर झाला नसला तरीही त्याचा प्रभाव मात्र राज्यातील काही भागात पाऊस पडतो आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील कच्चा घरांचं शेती पिकांचे तसेच फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. … Read more

लासलगावात कांद्याला चांगला भाव, शेतकऱ्यांमधून समाधान

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. आशियातील सर्वात मोठी असणारी नाशिक येथील लासलगाव बाजार समिती देखील बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता लासलगाव बाजार समितीचे व्यवहार सुरु ठेवण्यात आले आहेत. 24 मे पासून बाजार समित्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. कोरोना नियमांचं पालन करत बाजार समिती सुरू ठेवण्यास … Read more

‘यास’ चा महाराष्ट्रावर परिणाम, या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘यास’ चक्रीवादळ अखेर ओरिसात बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास धडकलं. या वादळाचा वेग ताशी 110 ते 120 किलोमीटर इतका होता. त्यामुळे ओडिसासह पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्यात तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. या वादळाचा थेट फटका महाराष्ट्राला बसणार नसला तरी मुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शुक्रवार ते … Read more

जाणून घ्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०२१ , ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

falabag

हॅलो कृषी ऑनलाईन : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०१८-१९ पासून सुरु करण्यात अली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबीचा लाभ घेऊ शकत नाही. या योजनेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी वर सुरु करण्यात आली आहे. –या योजनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी … Read more

बाजार समित्या बंदचा टोमॅटो उत्पादकांना फटका, जवळपास २५ कोटींपेक्षा अधिक नुकसान

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : नगर जिल्ह्याला टोमॅटोचं हब असं म्हटलं जातं. मात्र अकोला, संगमनेर भागातील बाजार समित्या काही दिवस बंद असल्यामुळे किलोमागे चार ते पाच रुपयांनी दर पडले आहेत. याचा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे पंधरा दिवसात सुमारे 25 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच ककुंबर मोजॅक व्हायरस व टोमॅटो क्लोरोसेस या … Read more

खुशखबर! यंदाच्या खरीप हंगामात सरकार 14,775 अतिरिक्त खर्च करणार, जाणून घ्या खतांची सबसिडी कशी मिळवाल ?

fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळा तोंडावर आल्यामुळे आता देशातील शेतकऱ्यांना खरीपाच्या लागवडीचे वेध लागले आहेत. यंदा मान्सून देखील वेळेत येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आता पावसाळी पिके घेण्यासाठी लगबग सुरु आहे. खतांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र केंद्र सरकारने DAP खतांवरील सबसिडी 500 वरून 1200 रुपयांपर्यंत वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा … Read more

error: Content is protected !!