थंडीचा परिणाम ! दुभत्या जनावरांमध्ये दूध कमी येण्याची शक्यता, कशी घ्यावी काळजी ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वत्र थंडीची चाहूल लागली आहे. अशावेळी जंवरांवरही वाढत्या थंडीचा परिणाम होत आहे. आधीच लंपी च्या प्रादुर्भावानंतर वैतागलेल्या पशुपालकांना आता वाढत्या थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीमुळे दुधाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर जनावरांची काळजी घेण्याची आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

दुग्ध उत्पादनात घट

वाढत्या थन्डीमुळे दूध उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जनावरांच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण घटल्याने त्याचा परिणाम दुधावर देखील होत असतो. हिवाळ्यापूर्वी नऊ ते दहा लिटर दूध देणारी जनावरे तापमानात घट झाल्यानंतर चार ते पाच लिटर दूध देऊ लागली आहेत. यामुळे पशुपालकांनी देखील जनावरांची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. जनावरांच्या गोठ्यात शेकोटी पेटवणे, तसेच जनावरांचे अंग झाकणे त्यांच्या शरीरातील उष्णता वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करणे असे उपाय पशुपालकांकडून केले जात आहेत. लम्पी आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इतर आजारांची देखील जनावरांना लागण होण्याची शक्यता असल्याने पशुपालकांनी जनावरांना जास्तीत जास्त उबदार वातावरण निर्माण करुन द्यावं, असं आवाहन पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी राजेंद्र लंघे यांनी केलं आहे.

काय घ्याल काळजी ?

–जनावरांना रात्रीच्यावेळी शेडमध्ये किंवा गोठ्यातच बांधावे
–तसेच रात्रीच्या वेळी जनावरांच्या अंगावर गोणपाट टाकावे
—त्याचबरोबर गोठ्यामध्ये ऊब निर्माण व्हावी यासाठी शेकोटी पेटवावी
–जनावरे शेडमध्ये बांधलेल्या ठिकाणी उघडी असलेली बाजू कापडाने किंवा आणखी पर्यायी मार्गाने झाकावी जेणेकरुन वारा आत येऊन जनावरांना थंडी जाणवणार नाही

error: Content is protected !!