हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील 10 कोटींहून अधिक शेतकरी पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या 12व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठे बदल केले आहेत. अशा परिस्थितीत पीएम किसान मध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत, या लेखात जाणून घेऊया.
पीएम किसानबाबत मोठा बदल
आता पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान (PM Kisan) योजनेची स्थिती तपासणे सोपे झाले आहे. आता नवीन नियमानुसार, शेतकरी केवळ मोबाईल नंबरद्वारे पंतप्रधान किसान योजनेची स्थिती तपासू शकतात. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना हवे असल्यास ते फक्त नोंदणी क्रमांकाद्वारे योजनेची स्थिती तपासू शकतात.
पीएम किसान स्थिती तपासण्यासाठी नियम
पीएम किसान योजनेच्या सुरुवातीपासूनच यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी, पीएम किसान पोर्टलद्वारे, कोणताही शेतकरी आधार क्रमांक, मोबाइल किंवा बँक खात्याच्या आधारे पीएम किसानची स्थिती तपासू शकत होता. पण नंतर त्यात बदल करण्यात आला आणि शेतकऱ्यांना केवळ आधार क्रमांक किंवा बँक खात्याद्वारे पीएम किसानची (PM Kisan) स्थिती तपासण्याची सुविधा देण्यात आली.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत आता सरकारच्या पीएम किसान योजनेचे स्टेटस तपासण्याच्या नियमात बदल केल्यानंतर पुन्हा एकदा फक्त मोबाईल नंबर आणि नोंदणी क्रमांकाने स्टेटस तपासता येणार आहे.
अशा परिस्थितीत, पंतप्रधान किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याचे पैसे खात्यात येण्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी ही बातमी कोणत्याही आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही. लाभार्थी शेतकर्यांना 31 जुलैपूर्वी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जर शेतकऱ्यांनी या शेवटच्या तारखेपूर्वी ई-केवायसी केले नाही तर शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ (PM Kisan) घेऊ शकणार नाहीत.