खरिपातील कापसावर थ्रिप्स तर सोयाबीन वर लष्करी अळीचा हल्ला ;बळीराजा हवालदिल !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गजानन घुंबरे, परभणी प्रतिनिधी

खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या कापूस पिकावर थ्रिप्स चा प्रादुर्भाव झाल्याने कापुस लाल झाला पडला असून दुसरीकडे सोयाबीन पिकावर लष्करी अळीने हल्लाबोल केला आहे .अतिवृष्टी व पावसाच्या खंडानंतर आधीच उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येणार असताना आता किटकांनी हल्ला केल्याने परभणी जिल्हातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

जिल्हातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेली संकटाची मालिका थांबायचे नाव घेत नाहीये .आधी मान्सूनचे उशिरा आगमन झाले त्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या . त्यात अतिवृष्टी पावसाचा खंड यामुळे जिल्ह्यातील शेतीशिरात पेरणी केलेले क्षेत्र यातून मिळणारे अपेक्षित उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे.

आपण जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या क्षेत्राची प्रतिनिधी माहिती घेतल्यानंतर जिल्ह्याचे चित्र याविषयी कल्पना येईल .मागील आठवड्यात खरिपातील पावसाच्या खंडानंतर शेतकऱ्यांना विमा अग्रीम देण्यासाठी ५२ महसूल मंडळापैकी आठ महसूल मंडळांची निवड करण्यात आली आहे .त्यामध्ये निकषांमध्ये बसत असतानाही पाथरी तालुक्यातील सर्वच महसूल मंडळ वगळण्यात आले आहेत नेमकी काय परिस्थिती पाथरी तालुक्यातील महसूल मंडळामध्ये आहे याविषयी आपण घेतलेला हा मागवा व सद्य परिस्थिती.

यंदा पाथरी तालूक्यातील चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या प्रस्तावित क्षेत्रापैकी ऊस वगळता ७१ .७२% क्षेत्रावर म्हणजे ३७ हजार ३८० हेक्टर हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी पूर्ण केली .यामध्ये सर्वाधिक १६ हजार ६५४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी तर मागील वर्षी मिळालेल्या चांगल्या दरामुळे १६ हजार ४३२ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड स्थानिक शेतकऱ्यांनी केली होती.

जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस झाला. सततच्या पावसाने खरिपात पेरणी केलेल्या पिकांची वाढ खुंटल्या गेली .ही पिके कशीबशी सावरत असताना ऐन फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये ऑगष्ट महिण्यात पावसाने मोठा खंड दिला .१० ऑगस्ट पासून ते ५ सप्टेंबर पर्यंत तालुक्यात येणाऱ्या चारही महसूल मंडळांमध्ये यावेळी पावसाने ओढ दिली होती .या खंडामुळे फुल अवस्थेत असणाऱ्या सोयाबीनला मोठा फटका बसला तर कापसामध्ये ही पातेगळ होऊन स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने केलेली मेहनत वाया गेली .आस्मानी संकटापुढे स्थानिक शेतकरी हातबल होता दरम्यान अग्रीम विमा मिळेल अशा आशेवर असणारा शेतकरी चारही महसूल मंडळ अग्रीम विमा देण्यातून वगळण्यात आल्याने सुलतानी संकटाने होरपळून निघाला.

दरम्यान ५ सप्टेंबर पासून तालुक्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये पावसाचे जोरदार पुनरागमन झाले होते .दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली असून शेत शिवारात मात्र सर्वच पिकांवर किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. सततच्या फवारण्या करूनही कापूस पिकावर थ्रिप्स चा प्रादुर्भाव झाला असून यामुळे कापूस लाल पडला आहे तर कापसाची पातेगळ मोठ्या प्रमाणात झाल्याने कापसामध्ये ४०% पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत .महागड्या फवारण्या करूनही हा रोग काही आटोक्यात येत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत .तर दुसरीकडे सर्वाधिक पेरणी क्षेत्र असलेल्या फुलगळ होऊन उभ्या असलेल्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक हा बुरशीजन्य रोग व मोठ्या प्रमाणात पाणी खाणाऱ्या लष्करी अळीचा हल्ला झाल्या असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे . सततच्या या संकटांच्या मालिकेने स्थानिक शेतकरी मात्र हातबल झाला असुन व्यथा सांगावी तरी कोणाला ? असा त्याच्यापुढे प्रश्न पडला आहे .

error: Content is protected !!