Tuesday, February 7, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करणार ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
September 12, 2022
in बातम्या, राजकारण
Eknath shinde
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सकाळी पार पडली या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे अतिवृष्टी बाधित किंवा आपत्ती प्रवण गावांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

मागच्या दोन तीन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान राज्यात होत आहे. त्या धर्तीवर शिंदे सरकारने अतिवृष्टी बाधित किंवा आपत्ती प्रवण गावांचं पुनर्वसन करण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. या निर्णयासंदर्भात कोणत्या अटी आणि नियम असतील हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.

कोविडकाळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना मंत्रिमंडळाचा दिलासा.सार्वजनिक आरोग्यमधील भरतीवेळी कंत्राटी सेवा बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांची गुणांकन कार्यपद्धती तयार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत इतरही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

१)अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करणार. नागरी सुविधा पुरविण्यासाठी धोरण
२)नाशिक जिल्हयातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पास चौथी सुधारीत प्रशासकीय मान्यता.
३)नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास मान्यता.
४)महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या मुंबई, पुणे व नागपूर खंडपीठास मुदतवाढ.
५)केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणीकरण करण्यासाठी योजना राबविणार.
६)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सप्टेंबर २०२२ पूर्वी पार पडणार नसल्याने प्रशासकांचा कालावधी वाढणार

दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. वेगाने फोफावणाऱ्या राज्यातील लंपी रोगाबाबत आपापल्या भागातील आजार रोखण्यावर लक्ष देण्याच्या सूचना केल्या. ‘राज्यात लम्पी आजाराने पशुंना ग्रासले असून या आजारावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक पाऊले तातडीने उचलावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सज्ज राहून आपापल्या भागात हा आजार रोखण्यावर बारकाईने लक्ष देण्याच्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ वर लम्पी आजाराबाबत मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: Cabinet MeetingCM Eknath ShindeMaharashtra Government
SendShareTweet

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group