सूर्याचा पारा चढला ; आजपासून मध्य महाराष्ट्रासह ‘या’ भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेत वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे उच्चांकी 42. ९ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मंगळवारी विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात आज पासून उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्याच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्यात. दरम्यान आज पासून दोन ते चार अंश यांचे आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नगर येथे 24.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशांची वाढ झाल्यानं इथं उष्णतेची लाट आली आहे. दोन एप्रिल पर्यंत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला.

या भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा
आज मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर या भागाला उष्णतेच्या लाटेचा अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

या भागात तापमान 40 आंशांचा वर

अकोला 42.0, चंद्रपूर 42. २, वर्धा 42, नगर 41. 6 ,सोलापूर 4१. 6, वाशिम 41.5, अमरावती 41, नागपूर 41, परभणी, नांदेड 41.2, यवतमाळ 41

Leave a Comment

error: Content is protected !!