हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या राजभरात पावसानं (Weather Update) चांगलीच उघडीप दिली आहे. तुरळक ठिकाणी मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसतो आहे. सध्या पावसाची उघडी असली तरी 30 ते31 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विदर्भ, संलग्न मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. शिवाय एक आणि दोन तारखेला सुद्धा अशीच स्थिती राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान स्थिती
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. बिहार आणि परिसरावर, उत्तर प्रदेश, तसेच केरळ परिसरावर वेगवेगळ्या चक्राकार वाऱ्यांच्या (Weather Update) स्थिती आहेत. विदर्भापासून आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अंदमान समुद्रापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
30-31 ऑगस्ट दरम्यान राज्यात विदर्भात, सलग्न मराठवाडा, द.मध्य महाराष्ट्र हलका ते मध्यम पावसांची शक्यता. IMD GFS मोडेल नुसार.
1,2 ला पण अशीच स्थिती राहण्याची शक्यता. घाट भागात पण. pic.twitter.com/sQQoMiaSmQ— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 29, 2022
‘या’ भागाला यलो अलर्ट
हवामान खात्याच्या पुणे विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद,सोलापूर, सांगली आणि सातारा या भागामध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे या भागाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर दिनांक 30 रोजी औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड आणि बीड या भागासाठी येल्लो अलर्ट दिला असून या भागात विजांसह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याच्या पुणे विभागाकडून देण्यात आली आहे.