हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशाच्या उत्तरेकडील भागात थंडी वाढत असून डोंगराळ भागात बर्फवृष्टी देखील होत आहे. मात्र राज्यात अद्याप म्हणावी तशी थंडी नाही. तापमानात सतत चढ- उतार (Weather Update) होत आहे. संपूर्ण देशाचा विचार करता मागच्या २४ तासात राजस्थानातील चुरु येथे १०. ४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर राज्याचा विचार करता राज्यात किमान १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तरेकडील गार वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यातही थंडी वाढण्याची शक्यता आहे.
हवामान स्थिती ?
बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे (Weather Update) वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात आज (ता. १७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. वायव्येकडे सरकणारी ही प्रणाली शनिवारपर्यंत (ता. १९) आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर, तसेच केरळ आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत.
किमान तापमान कमी होत असतानाच कमाल तापमान ३० ते ३५ अंशांच्या आसपास कायम आहे. सांताक्रुझ येथे कमाल ३५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दरम्यान आज राज्यात आकाश निरभ्र राहून, कोरड्या हवामानासह, किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कुठे किती तापमान ?(Weather Update)
बुधवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३१.७ (१४.३)
जळगाव ३२.४ (१४.०)
धुळे ३२.० (१२.०)
कोल्हापूर ३२.१ (१९.२)
महाबळेश्वर २६.३(१३.९)
नाशिक ३१.१ (१४.४)
निफाड ३१.१ (१३.२)
सांगली ३२.६(१८.०)
सातारा ३१.२(१५.५)
सोलापूर ३३.२ (१५.८)
सांताक्रूझ ३५.१(२१.४)
डहाणू ३१.८ (१९.९)
रत्नागिरी ३४.५ (२१.३)
औरंगाबाद ३१.४ (१३.०)
नांदेड ३२.६ (१५.०)
परभणी ३२.२ (१४.१)
अकोला ३२.४ (१५.४)
अमरावती ३१.८ (१४.०)
बुलडाणा ३०.० (१५.६)
ब्रह्मपुरी – (१५.३)
चंद्रपूर – (१५.२)
गडचिरोली ३१.२(१३.२)
गोंदिया २९.८(१२.५)
नागपूर ३१.० (१३.८)
वर्धा ३१.९ (१४.०)
वाशीम ३२.५ (१६.८)
यवतमाळ ३२.० (१२.५).