हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरेकडील थंडी ही महाराष्ट्राकडे येऊ लागल्यामुळे आजपासून राज्यात (Weather Update) थंडी वाढण्याची शक्यता आहे. मात्र ही थंडी फार कला राहणार नसून चार दिवसानंतर हा गारठा पुन्हा कमी होण्याचे संकेत. आहेत. दरम्यान मागच्या २४ तासात राज्यात ११.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर राजस्थानमधील चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील चार दिवस किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. आज (ता. १८) राज्यात आकाश निरभ्र राहून, कोरड्या हवामानासह, किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान स्थिती
अंदमान समुद्रात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच (Weather Update) समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. वायेव्यकडे सरकणारी ही प्रणाली शनिवारपर्यंत (ता. १९) आणखी तीव्र होण्याचे संकेत असून, ही प्रणाली तमिळनाडू आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. नैॡत्य अरबी समुद्रात विषूववृत्ताजवळ समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
कुठे किती तापमान ?(Weather Update)
गुरुवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३१.६ (१२.९),
जळगाव ३२.७ (१४.५),
धुळे ३२ (११.५),
कोल्हापूर ३१.६ (१७.१),
महाबळेश्वर २७.१(१२.८),
नाशिक ३०.९ (१३.९),
निफाड २९.६ (११.५),
सांगली ३२.३(१५.८),
सातारा ३०.७(१३.४),
सोलापूर ३३.४ (१४.७),
सांताक्रूझ ३३(२०.४),
डहाणू ३१.६ (२०.७),
रत्नागिरी ३५.२ (२०.३),
औरंगाबाद ३१ (१२.५),
नांदेड ३२.४ (१४.८),
परभणी ३१.९ (१४.१),
अकोला ३२.३ (१५.२),
अमरावती ३२.४ (१३.८),
बुलडाणा ३०.२(१५.८),
ब्रह्मपुरी ३२.७ (१५.९),
चंद्रपूर २९.९ (१५.८),
गडचिरोली २९.०(१४),
गोंदिया ३०.५(१३.५),
नागपूर ३१.४ (१४.८),
वर्धा ३१.२ (१४),
वाशीम ३२.५ (-),
यवतमाळ – (१२.५).