हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या उकाड्याचा (Weather Update) अनुभव नागरीक घेत आहेत. गारठा कमी झाला असून उकाड्यात वाढ झाली आहे तर दुपारी उन्हाचा चटका जाणवतो आहे. किमान आणि कमाल तापमानात सतत चढ-उतार सुरु आहे. राज्यात कमाल तपमान २८ ते ३५ अंशांपर्यंत पोहचले आहे. विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील निचांकी ९.६ अंश सेल्सिअस, तर धुळे येथील कृषी महाविद्यालयात १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
हवामान स्थिती
आग्नेय अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. तर पूर्व मध्य बंगालच्या उपसागरामध्ये (Weather Update) समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. राज्यात आकाश निरभ्र होत आहे. यातच किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला असून, दुपारच्या वेळी उन्हाचा कायम आहे.
कुठे किती तापमान ? (Weather Update)
सोमवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३१.९ (१७.१), जळगाव ३१.८ (१२.७), धुळे ३०.५ (१०.०), कोल्हापूर ३०.६ (-), महाबळेश्वर २४.४(१६.७), नाशिक ३०.९ (१३.३), निफाड ३०.८ (११.१), सांगली ३१.८(२१.३), सातारा २७.६(२१.३), सोलापूर ३३.८ (२०.०), सांताक्रूझ ३४.३(२०.०), डहाणू २९.८ (१८.०), रत्नागिरी ३२.५ (२३.५), औरंगाबाद ३१.४ (१२.२), नांदेड – (१५.४), उस्मानाबाद – (१७.४), परभणी ३१.४ (१४.५), अकोला ३३.० (१४.०), अमरावती ३२.० (१२.४), बुलढाणा ३०.० (१४.५), ब्रह्मपूरी ३१.२ (१३.०), चंद्रपूर २८.६ (१३.४), गडचिरोली ३१.२(१०.४), गोंदिया २८.६(९.६), नागपूर २९.९ (११.३), वर्धा ३०.९(१२.०), यवतमाळ ३०.० (११.५).