हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे थंडी जणू गायबच झाली आहे. हेच तापमान (Weather Update) पुढे चालू राहणार नसून पुढच्या दोन दिवसात राज्यातील किमान तापमानात २-३ अंशांची घट होणार असून त्यानंतर पुन्हा तापमान वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मागच्या २४ तासात देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद राजस्थानातील चुरु येथे झाली. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे राज्यातील नीचांकी ९.९ तापमान नोंदविले गेले. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३४.८ अंश तापमान नोंदले गेले.
हवामान स्थिती ?
बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या प्रणालीची (Weather Update) तीव्रता वाढून, पूर्व किनाऱ्यालगतच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहे. गुरुवारी (ता. ८) सकाळपर्यंत ही वादळी प्रणाली उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कुठे किती तापमान ? (Weather Update)
सोमवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३२.१ (१८.५)
जळगाव ३१.५ (१९.८)
धुळे ३२ (१०.४)
कोल्हापूर ३१.६ (२१.२)
महाबळेश्वर २५.५(१६.७)
नाशिक ३०.४ (१७.८)
निफाड ३०.२ (९.९)
सांगली ३२.५(२०.५)
सातारा ३०.२(२१.४)
सोलापूर ३४.२ (२१.४)
सांताक्रूझ ३३.६(२३)
डहाणू २८.५ (२२.६)
रत्नागिरी ३४.८ (२३.५)
औरंगाबाद ३० (१७.५)
नांदेड – (१८.८)
उस्मानाबाद – (१९)
परभणी ३१.२ (२०.५)
अकोला ३२ (१८.५)
अमरावती ३२.४ (१६.७)
बुलडाणा ३१ (१८.८)
ब्रह्मपुरी ३२ (१५.५)
चंद्रपूर २९.८ (१६.६)
गडचिरोली ३१.६(१४)
गोंदिया २९ (१४.५)
नागपूर ३०.६ (१५.४)
वर्धा ३०.९(१६)
यवतमाळ ३१.५ (१६)