हेलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पाऊस कोसळत (Weather Update) असून अनेक ठिकाणी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हा पाऊस रब्बी हंगामासाठी जरी चांगला असला तरी काढणीस आलेल्या खरीप पिकांना नुकसानदायी ठरत आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र (Weather Update)
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून राज्यात आज (दि. 15 ऑक्टोबर) कोकण, घाटमाथ्यावर तसेच मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता (Weather Update) हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
जोरदार पावसाची शक्यता असणारे जिल्हे (यलो अलर्ट) – सांगली, सोलापूर
मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज असणारे जिल्हे (यलो अलर्ट) – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.
राज्यात काल (दि. 14 ऑक्टोबर) ब्रम्हपुरी येथे कमाल 36.7 अंश सें.ग्रे. तर महाबळेश्वर येथे किमान 18.9 अंश सें.ग्रे. तापमानाची नोंद झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.