हेलो कृषी ऑनलाईन : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय (Weather Update) झाले असून लक्षद्वीपकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट (Weather Update)
राज्यात आज (दि. 11 ऑक्टोबर) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता (यलो अलर्ट) तर पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नाशिक, नगर, सोलापूर, सांगली, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, जालना, बीड, वाशिम, परभणी, हिंगोली, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजासह जोरदार पावसाची शक्यता (यलो अलर्ट) असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
नैऋत्य मान्सून माघार घेण्यास अनुकूल परिस्थिती तयार झाली असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून नैऋत्य मान्सून माघार घेण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे..