हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सून परतीच्या प्रवासाला लागला आहे. पुण्यासह राज्यातलया अनेक भागात काल विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने (Weather Update) हजेरी लावली. मुंबईसह ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस झाला. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. वादळी वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हा पाऊस बरसणार आहे.
#SWMonsoon 2022. जुन ते सप्टेंबर.
राज्यात एकूण पाउस 123 %.🎉🎉
तर देशात 106 %
अजून राज्यात पाउस आहे…🌧🌧 pic.twitter.com/WYf2qlH6D6— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 30, 2022
हवामान स्थिती
पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. या प्रणालीपासून कर्नाटकच्या (Weather Update) किनाऱ्यापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात आज (ता. १) चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मॉन्सूनने थांबलेला परतीचा प्रवास पुन्हा सुरू करत गुरुवारी (ता. २९) संपूर्ण पंजाब, चंडीगड, राजधानी दिल्लीसह जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाना आणि राजस्थानच्या आणखी काही भागातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. मॉन्सूनच्या परतीची सीमा जम्मू, उना, चंडीगड, कर्नाल, बागपथ, दिल्ली, अलवार, जोधपूर ते नालिया पर्यंत असून, शुक्रवारी (ता. ३०) ही सीमा कायम होती.
या भागाला यलो अलर्ट
दरम्यान आज कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागात विजांसह पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता असून या भागाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.