हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या तापमानातील चढ आणि उतार (Weather Update) चालूच आहे. सध्या बहुतांशी भागात दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे तर पहाटेच्या वेळी गारठा अनुभवायला मिळत आहे. दरम्यान मागच्या २४ तासात किमान १२ अंश सेल्सिअसची नोंद झाली असून राज्यात कमाल तापमाचा पारा ३१ ते ३५ अंशांपर्यंत आहे. आज राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
हवामन स्थिती ?
नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत (Weather Update) बुधवारी (ता. ९) कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती झाले आहे. आजपर्यंत (ता. ११) ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, शनिवारपर्यंत (ता. १२) तामीळनाडू आणि पदुच्चेरीच्या किनारपट्टीकडे येण्याचे आणि त्यानंतर अरबी समुद्राकडे जाण्याचे संकेत आहेत.
कुठे किती तापमान ?(Weather Update)
बुधवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३१.२ (१२.८)
नगर ३३.० (-)
जळगाव ३३.६ (१५.८)
धुळे ३३.० (१२.०)
कोल्हापूर ३१.६ (१७.०)
महाबळेश्वर २६.९(१३.४)
नाशिक ३०.९ (१३.८)
निफाड ३०.० (१२.५)
सांगली ३१.८(१५.८)
सातारा ३१.५(१४.७)
सोलापूर ३३.८ (१७.०)
सांताक्रूझ ३४.४(२२.४)
डहाणू ३३.० (२१.५)
रत्नागिरी ३५.२ (२०.९)
औरंगाबाद ३१.२ (१३.४), नांदेड ३३.२ (१६.८), उस्मानाबाद – (१५.०), परभणी ३१.३ (१५.०), अकोला ३३.४ (१७.१), अमरावती ३२.४ (१५.३), बुलढाणा ३१.२ (१६.५), ब्रह्मपूरी ३३.२ (१६.९), चंद्रपूर ३०.६ (१७.८), गडचिरोली ३१.०(१५.६), गोंदिया ३०.४(१५.५), नागपूर ३१.७ (१६.२), वर्धा ३१.५(१६.८), वाशीम ३४.० (-), यवतमाळ ३१.५ (१४.५).