हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन दिवसांपासून राज्यात Weather Update) अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर बहुतांशी भागात ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्री वादळाचा परिणाम म्हणून राज्यात पाऊस होतो आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे
हवामान स्थिती
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ निवळल्यानंतर केरळ आणि परिसरावर (Weather Update) चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली अरबी समुद्रात येताच आज (ता. १३) पुन्हा कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली पश्चिम दिशेकडे किनाऱ्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान दक्षिण अंदमान समुद्रात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याचा अंदाज आहे.
सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. आज (ता. १३) कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. पावसाळी वातावरण निवळताच पुढील दोन दिवसांत किमान तापमानात २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. मागील २४ तासात राजस्थानमधील चूरू येथे देशाच्या सपाट भू-भागावरील सर्वांत नीचांकी ५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. निफाड आणि धुळ्यात पारा ११ अंशांवर पोचला आहे.
कुठे किती तापमान ? (Weather Update)
सोमवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३०.५ (२०.८), जळगाव ३१.५ (२१.९), धुळे ३२.० (११.०), कोल्हापूर २८.३ (२१.१), महाबळेश्वर २४.५(१६.६), नाशिक ३०.३ (१९.२), निफाड ३०.४ (११.०), सांगली २९.२ (२१.१), सातारा २८.३(२१.७), सोलापूर ३०.४ (२०.६), सांताक्रूझ ३२.५(२२.४), डहाणू ३०.१ (२३.३), रत्नागिरी ३३.३ (२४.०), औरंगाबाद ३०.० (१७.८), नांदेड २८.२ (२०.०), उस्मानाबाद – (१८.०), परभणी ३०.० (२२.०), अकोला ३१.८ (२१.४), अमरावती ३०.६ (१९.९), बुलडाणा ३०.० (२०.५), ब्रह्मपुरी ३२.६ (२०.६), चंद्रपूर ३१.२ (२१.०), गडचिरोली २९.६(१८.६), गोंदिया २६.८(१८.०), नागपूर २९.५ (२१.२), वर्धा २९.०(२१.५), यवतमाळ २५.० (२१.०).