हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे, कोल्हापूर सह राज्यातील अनेक भागात पावसाने (Weather Update) काल (१४) अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे शेत शिवारात पाणीच पाणी साठले होते. तर जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. आज (ता. १५) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मान्सूनचा प्रवास
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा अडखळत असलेला परतीचा प्रवास पन्हा सुरू झाला आहे. शुक्रवारी (ता. १४) मान्सूनने परतीच्या वाटचालीत मोठी मजल मारली. संपूर्ण, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या बहुतांश (Weather Update) भागांसह महाराष्ट्राच्या उत्तर भागातील नंदूरबार, धुळे, जळगावसह खानदेशच्या बहुतांश भागांतून मॉन्सून परतला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
यंदा २० सप्टेंबर रोजी वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या (Weather Update) मॉन्सूनने ३ ऑक्टोबरपर्यंत वायव्य भारतासह, गुजरात आणि अरबी समुद्राच्या काही भाग, मध्य भारताच्या काही भागांतून काढता पाय घेतला. त्यानंतर मात्र परतीच्या वाटचालीस तब्बल ११ दिवसांचा ‘ब्रेक’ लागला. शुक्रवारी (ता. १४) मॉन्सूनने उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरातच्या संपूर्ण भागासह, मध्य प्रदेशचा बहुतांश भाग, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि बहुतांश खानदेशासह महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मॉन्सून परतला आहे.
आज या भागाला यलो अलर्ट
दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.