हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मान्सूनच्या (Weather Update) परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक भागात पावसाची तीव्रता ओसरली असली तरी जळगाव , औरंगाबाद , विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, ब्रम्हपुरी या भागात माध्यम ते जोरदार पाऊस कोसळला. जळगाव जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे नद्या, नाले वाहू लागले आहेत. मागील दोन दिवसात जिल्ह्यातल्या ७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. या पावसानं कापूस, मका ही पिकं धोक्यात आली आहेत, तर सर्वसामान्य जनजीवनही विस्कळीत झालं आहे.
दरम्यान बंगालच्या उपसागरातील (Weather Update) कमी दाबाचे निर्मण झाल्यामुळे पुढील २-३ दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
20/09, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता, पुढील ३-४ दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
– IMD pic.twitter.com/INI5VvwrNq— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 20, 2022
आज ‘या’ भागाला यलो अलर्ट
दरम्यान आज दिनांक 21 रोजी पुणे, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा या भागाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला असून या भागात विजांच्या कडकडाटसह पाऊस (Weather Update) होण्याची शक्यता आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर या भागात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या भागालाही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे