हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मागच्या दोन दिवसांपासून थंडी (Weather Update) वाढली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे. निफाड येथे सर्वात कमी ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर मागच्या २४ तासात राजस्थानमधील चूरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज राज्यातील बहुतांशी भागात हवामान कोरडे राहणार असून तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे.
हवामान स्थिती
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता ओसरली (Weather Update) होती. ही ठळक कमी दाब प्रणाली आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत होती. वायेव्यकडे सरकणारी ही प्रणाली आज (ता. २३) आणखी निवळून जाण्याचे संकेत आहेत. उद्यापर्यंत (ता. २४) अंदमान समुद्रात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. १० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणांमध्ये निफाड ७.४, धुळे ८.२, जळगाव ९.२, नाशिक ९.५, औरंगाबाद १०.० या जिल्ह्यांचा समावेश आहे.
कुठे किती तापमान ? (Weather Update)
मंगळवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे २८.९ (११.२), जळगाव २९.३ (९.२), धुळे २८ (८.२), कोल्हापूर २९ (१२.२), महाबळेश्वर २५.६(१२.१), नाशिक २७.५ (९.५), निफाड २७.१ (७.४), सांगली २९.५(१८.१), सातारा २८.८(१५.५), सोलापूर ३२.२ (१८.८), सांताक्रूझ ३१.७(१७), डहाणू ३१.४ (१६.५), रत्नागिरी ३२.५ (१९.१), औरंगाबाद २९.५ (१०), नांदेड ३०.२ (१६), परभणी २९.४ (१४.२), अकोला ३०.१ (१३.१), अमरावती २९ (११.७), बुलडाणा २७.३ (१२.५), ब्रह्मपुरी ३०.२ (१४.१), चंद्रपूर २७.८ (१४.८), गडचिरोली ३० (१३), गोंदिया २७.६(११.२), नागपूर २८ (१३), वर्धा २८(१३), वाशीम २९.८ (१३), यवतमाळ २९.५ (१०.५).