हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून पावसाने राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाने (Weather Update) ओढ दिलेली आहे. वावरात असणारे सोयाबीन सह इतर पीक सध्या फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. पीक मुख्य अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल्यामुळे वावरातील पिकं माना टाकतानाचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
29/08,राज्यात पुढच्या 4 दिवसात काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता. बहुतेक ठिकाणी 🌩 दुपार नंतरच.
अन्य ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, मुंबई ठाणे सहीत ..
IMD pic.twitter.com/Ej0Hq5FwRi— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 29, 2022
विजांसह पाऊस होण्याची शक्यता
मात्र हवामान खात्याकडून एक चांगली बातमी आलेली आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या तीन दिवसांमध्ये राज्यातल्या काही भागांमध्ये विजांसह पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित भागात हलका पाऊस होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हवामान तज्ञ के एस होळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या तीन दिवसांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस कोसळणार आहे. हा पाऊस दुपारनंतरच होण्याची शक्यता असून इतर ठिकाणी मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल
या भागाला यलो अलर्ट
आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि नांदेड या भागाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस (Weather Update) होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
तर उद्या दिनांक 31 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि नांदेड या भागाला येलो अलर्ट देण्यात आला असून या भागात विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.