हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात किमान तापमानाचा पारा पुन्हा एकदा (Weather Update) वर चढत असून थंडीने पळ काढला की काय असे वाटत आहे. हवामानातील हे बदल कायमस्वरूपी नसून दोन-तीन दिवसात हळूहळू किमान तापमानाची घसरण होऊन 9 डिसेंबर पासून पुन्हा एकदा हुडहूडी भरण्यासारखी थंडी पडण्याची शक्यता आहे. मागच्या २४ तासात उत्तर महाराष्ट्रातील निफाडच्या गहू संशोधन केंद्र येथे राज्यातील नीचांकी ९.६ तापमान नोंदविले गेले. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३४ अंश तापमान नोंदले गेले.
हवामान स्थिती
डिसेंबर मध्ये चांगली सुरुवात होऊनही दक्षिणेकडून अल्प आद्रतेचा शिरकाव व उत्तरेकडून होत असलेला थंडीचा माराही नंतर स्थिरावल्यामुळे थंडी कमी झाल्याचे चित्र सध्या राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान दीर्घावधीच्या मासिक अंदाजानुसार साधारणतः 9 डिसेंबर पासून महिन्याच्या उर्वरित तीन आठवड्यात राज्यभर पहाटेच्या सुमारास किमान तापमानात (Weather Update) सरासरीपेक्षा घट होईल. त्यामुळे थंडीची शक्यता 55% जाणवेल नगर व हिंगोली जिल्ह्यात तर ही शक्यता 65 टक्के आहे. बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात आजपर्यंत (ता. ५) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत (ता. ७) ही प्रणाली तीव्र होईल.
तर मराठवाड्यासह नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर तसेच वर्धा नागपूर जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरी इतके जाणवण्याची शक्यता आहे 55% आहे यासह मराठवाड्यात दिवसा अधिक उबदारपणा व उर्वरित महाराष्ट्रात (Weather Update) नेहमीसारखे साधारण वातावरण राहील असे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.