हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील किमान तापमानात वाढ झाली असून थंडी कमी झाली आहे. दिवसाच्या तापमानात (Weather Update) मात्र वाढ झाली असून उन्हाचा चटका कायम आहे. बंगालच्या उपसागरातील प्रणालीच्या प्रभावामुळे ढगाळ हवामानासह पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मागच्या २४ तासात देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३५ अंश तापमान नोंदले गेले.
पावसाळा पोषक हवामान
राज्यात ढगाळ वातावरण होऊन पावसाला पोषक हवामान (Weather Update) होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून (ता. ९) कोकणात तर शनिवारपासून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. सध्या राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान होत असल्यामुळे शेती पिकांवर त्याचा परिणाम होत आहे.
हवामान स्थिती
बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ कमी दाब (Weather Update) क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून, पूर्व किनाऱ्यालगतच्या उपसागरात आज (ता. ७) चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहे. उद्या (ता. ८) सकाळपर्यंत ही वादळी प्रणाली उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याकडे येणार आहे. या वादळाच्या प्रभावामुळे पूर्व किनाऱ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कुठे किती तापमान ?(Weather Update)
मंगळवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३२.२ (१७.०), जळगाव ३१.८ (१८.७), धुळे ३२.० (१५.६), कोल्हापूर ३१.१ (१९.१), महाबळेश्वर २४.७(१४.४), नाशिक ३१.३ (१८.८), निफाड ३०.८ (१७.१), सांगली ३१.४(१७.८), सातारा २९.८(१९.३), सोलापूर ३३.० (१६.७), सांताक्रूझ ३३.६(२३.४), डहाणू २८.२ (२२.६), रत्नागिरी ३५.० (२३.६), औरंगाबाद ३०.६ (१४.८), नांदेड ३२.० (१६.८), उस्मानाबाद – (१५.०), परभणी ३०.८ (१५.५), अकोला ३१.८ (१८.२), अमरावती ३२.४ (१६.७), बुलडाणा ३०.० (१७.५), ब्रह्मपुरी ३२.२ (१५.६), चंद्रपूर २९.८ (१६.४), गडचिरोली ३०.२(१३.२), गोंदिया २९.८(१३.६), नागपूर ३०.३ (१५.२), वर्धा ३१.०(१६.८), यवतमाळ ३०.५ (१८.०).