हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पुण्यासह इतर भागांमध्ये दुपारनंतर पावसानं (Weather Update) विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 8 सप्टेंबर पासून पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. विजांच्या कडकडाट्यासह आणि वादळी वाऱ्यासह हा पाऊस कोसळेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे तर राज्यातील काही भागाला मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. येथे दर्शविलेल्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदारची
शक्यता आहे.
IMD
Mumbai keep watching updates for coming week end pl. pic.twitter.com/7LVAAXc0GT— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 6, 2022
हवामान स्थिती
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पावसाचा (Weather Update) जोर वाढण्याचे संकेत देण्यात आले आहेत शिवाय हे कमी दाबाचे क्षेत्र पुढील काही दिवस असेच राहणार असल्यामुळे पुढचे पाच दिवस राज्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे बहुतेक क्षेत्रातील पिकांनी माना टाकल्या होत्या मात्र आता पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस पडल्यामुळे शेतामध्ये पाणी साचून राहिल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
‘या’ भागाला आज यलो अलर्ट
राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, या भागाला जोरदार पावसाचा (Weather Update) इशारा देण्यात आला आहे. तर सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, जालना, औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली या भागामध्ये विजांच्या कडकडेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. या भागाला देखील हवामान खात्याकडून आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.