‘या’ जादुई फुलांची शेती तुम्हाला मिळवून देईल बक्कळ कमाई ; ओसाड जमिनीवरही उगवेल सोनं, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतात, जवळजवळ सर्व राज्यांमध्ये फुलांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगले उत्पन्न मिळते. भारतीय फुलांना देशाबरोबरच परदेशातही मोठी मागणी आहे. त्याच वेळी, राज्य सरकारे देखील फुलांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे अनुदान देत आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा फुलाबद्दल सांगणार आहोत, ज्याची लागवड शेतकऱ्यांचे नशीब बदलू शकते. विशेष म्हणजे या फुलाच्या लागवडीमध्ये खर्च खूपच कमी असतो, तर कमाई खूप जास्त असते. त्यामुळेच या फुलाच्या लागवडीला जादुई व्यवसाय असेही म्हणतात. म्हणजेच त्यात नुकसान होण्याची शक्यता फारच कमी आहे.

खरं तर, आपण जादुई फ्लॉवर म्हणजेच कॅमोमाईल फ्लॉवरबद्दल बोलत आहोत. त्याची लागवड शेतकऱ्यांचे नशीब बदलू शकते, असे म्हटले जाते. उत्तर प्रदेश आणि बुंदेलखंडमधील हमीरपूर जिल्ह्यातील शेतकरी या जादुई फुलाची मोठ्या प्रमाणावर लागवड करत आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले आहे. अशा परिस्थितीत हळूहळू कॅमोमाईल फ्लॉवरच्या लागवडीकडे शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. या फुलांपासून आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधे बनवली जातात. त्यामुळे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक औषधे बनवण्यासाठी खासगी कंपन्या या फुलांची बंपर खरेदी करतात, ज्यामुळे शेतकरी भरपूर कमावतात.

पोटाशी संबंधित आजारांवर प्रभावी

मनी कंट्रोल या न्यूज वेबसाइटनुसार, कॅमोमाइलच्या फुलांमध्ये निकोटीन आढळत नाही. पोटाशी संबंधित आजारांवर हा रामबाण उपाय आहे. याशिवाय या फुलांचा उपयोग सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठीही केला जातो. स्थानिक शेतकरी सांगतात की, जेव्हापासून त्यांनी शेती करायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांचे नशीबच पालटले आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आयुर्वेद कंपनीत जादुई फुलांची मागणी जास्त आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी या फुलाची लागवड सुरू केली आहे.

कॅमोमाईल फ्लॉवरचे वैशिष्ट्य म्हणजे ते ओसाड जमिनीवरही वाढू शकते, कारण त्याला सिंचनासाठी फारच कमी पाणी लागते. तसेच एक एकरात लागवड करून ५ क्विंटल फुले मिळू शकतात. त्याच वेळी एक हेक्टरमध्ये सुमारे 12 क्विंटल जादुई फुलांचे उत्पादन होते. त्याची लागवड खर्चापेक्षा ५ ते ६ पट अधिक नफा देऊ शकते, असे शेतकरी सांगतात. त्याचे पीक ६ महिन्यांत तयार होते. म्हणजे शेतकरी 6 महिन्यांत लाखो रुपये कमवू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही त्याची लागवड सुरू केली तर तुम्ही लवकरच करोडपती होऊ शकता.

error: Content is protected !!