Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात 3 जूनपासून पाऊसाला सुरवात होणार; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, पेरणी कधी करावी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Panjabrao Dakh Havaman Andaj) | मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. वातावरणातील उकाडा वाढल्याने अनेकजण कधी एकदा पावसाळा सुरु होतोय याचाही वाट पाहत आहेत. आता याबाबत एम महत्वाची अपडेट समोर आली असून आज केरळ येथे मान्सून दाखल झाला आहे. ३ जून पासून महाराष्टरातील विविध भागात पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

दरवर्षी पेक्षा या वर्षी मान्सून लवकर दाखल झाला आहे. १ जून ला केरळ मध्ये मान्सूनचे आगमन झाल्याने देशातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. २-३ जून ला केरळला मुसळधार पाऊस होणार आहे. यानंतर ७-८ जूनच्या दरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांत पुढील ५ दिवस पाऊस होणार याबाबत आम्ही तुम्हाला इथे माहिती देणार आहोत.

उत्तर महाराष्ट्र मध्ये ३ जून ते ५ जून दरम्यान पाऊस होणार आहे. तसे पाहता ३ जूनपासून महाराष्ट्रात पाऊस सुरु होणार असला तरी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा इथे ४,५,६ जूनला पाऊचा अंदाज सांगण्यात आला आहे. ३ जूनला नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, जालना, परभणी, हिंगोली, बीड, संभाजीनगर, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे पाऊस होणार आहे. यावेळी सोलापूर ला नेहमीपेक्षा अधिक पाऊस होईल असे बोलले जात आहे. (Panjabrao Dakh Havaman Andaj)

तुमच्या गावात पाऊस होणार का ते असं केले 1 मिनिटांत चेक

शेतकरी मित्रांनो वातावरणात कधी ऊन तर कधी पावसाचे पहायला मिळतो. यामुळे वातावरणात रोज बदल जाणवतो. आता आपल्याला स्वतःच्या आपल्या गावात पाऊस होणार का हे जाणून घेणं सोयीचं झालं आहे. यासाठी Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi ॲपचे नाव सर्च करा आणि ॲप इंस्टॉल करा. हॅलो कृषी अँपवर तुम्हाला जमीन मोजणी, सातबारा उतारा, पशुपालन, सरकारी योजना, शेतमाल थेट खरेदी विक्री अशा बाबीचा आता एकही रुपये खर्च न करता लाभ घेता येतो.

https://youtu.be/-PDs6vURBTw

पेरणी कधी करावी?

अवकाळी पाऊसामुळे अलीकडे पेरणी कधी करावी याबाबत शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतात. आता ८ जूनला मान्सून राज्यात दणदणीत आगमन करणार आहे. मात्र असे असले तरी ३ जूनपासूनच राज्यात विविध भागात पाऊस पडणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये असा सल्ला पंजाबराव डंख यांनी दिला आहे. जमिनीत २ वित ओलावा आला कि त्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला देण्यात आला आहे.

error: Content is protected !!