Weather Update : पुढील 2,3 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांत गारपीटीची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । राज्यात गेल्या 24 तासात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाउस पडला आहे. यामध्ये नंदूरबार,नाशिक, कोल्हापूर, पिंपरी पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, सातारा या जिल्ह्यांना पावसाने काळ संध्याकाळी झोडपले आहे. राज्यात काही ठिकाणी गारपीटही झाली असून यामुळे शेतमालाचे नुकसान झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. पुढच्या 2,3 दिवस मेघगर्जनेसह पावसाचे इशारे कायम असून काही ठिकाणी गारपीटीची शक्यताहि हवामान विभागाने वर्तवली आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार काय?

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गावातील हवामान अंदाज जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करायचं आहे. हिरव्या रंगाचा लोगो असणारे Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड केल्यांनतर इथे शेतकऱ्यांना पुढील पाच दिवसांचा स्वताच्या गावातील हवामानाच्या अंदाजाची माहिती देण्यात येते. आपल्या गावातील अचूक हवामान अंदाज समजून घेऊन त्यावर आवश्यक खबरदारी काय घ्यावी, कोणत्या पिकावर काय औषध फवारणी करावी याची माहितीसुद्धा हॅलो कृषी अँपवर देण्यात येते. तेव्हा आजच गुगल प्ले स्टारला जाऊन Hello Krushi डाउनलोड करा आणि या सेवेचे लाभार्थी बाणा.

काल १५ मार्च रोजी, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांसह हलक्या पावसाने हजरी लावली. आजपासून राज्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पावसाचा तर विदर्भात वादळीवाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ढगाळ हवामान, पावसाळी वातावरणाने तापमानात काही ठिकाणी घट झाली आहे तर काही भागात उकाडा वाढला आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.४ डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर तामिळनाडू ते कोकण कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. पश्चिम बंगाल ते ओरिसा या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बंगाल उपसागावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे व पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.

वादळी पावसाचा इशारा, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार (Weather Update)

हवामान विभागाने पुढील दोन तीन दिवसात राज्यात ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहणार असल्याचे सांगितले आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, नाशिक, पुणे येथे विजांच्या गडगडाटासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

error: Content is protected !!