‘विकेल ते पिकेल’ या तत्वाने राज्यात उत्पन्नवाढीचे नवे तंत्र राबविणार: कृषिमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी । सरकार नेहमी शेतकऱ्यांसाठी काही ना काही स्कीम घेऊन येत असते. त्यामागे त्यांचा एकच हेतू असतो की शेतकऱ्यांचा फायदा व्हावा. या वेळी राज्य शासन अशीच एक योजना आखत आहे. आणि हे तंत्र ह्याच वर्षपासून राबविले जाणार आहे. ह्या योजनेअंतर्गत विकेल ते पिकेल या तत्वाने राज्यात उत्पन्न वाढवण्याचे तंत्र राबविले जाणार आहे अशी माहिती राज्य कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली.

या योजनेद्वारे प्रत्येक गावाच्या जमिनीचा पोत, त्यांची उत्पादन क्षमता आणि त्या मातीत येणारे उत्पन्न ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. म्हणजे त्यानुसार त्या गावाने कोणते उत्पन्न घ्यावे म्हणजे त्यांचे उत्पन्न वाढेल हे सांगितले जाणार. त्यासाठी प्रत्येक गावात ग्राम कृषी विकास समिती स्थापन केली जाणार आहे. आणि त्या समितीद्वारे ही सगळी काम केली जाणार आहेत. यातून राज्याची कृषी उत्पादकता वाढेल असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला.

दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी युरियाची टंचाई भासणार नाही. राज्यसरकारने दिड लाख मेट्रिक टन युरियाचा बफर स्टोक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे बियाण्यावर देखील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर भुसे म्हणाले की, “राज्यात करोना संक्रमणाच्या काळातही आर्थिक स्थिती ही चांगली आहे. शेतकऱ्यांचे यामध्ये खूप मोठे योगदान आहे.राज्यसरकार शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे”. यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा फायदेशीर ठरणार आहे.

 

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा👇🏼👇🏼👇🏼*
https://chat.whatsapp.com/GkHDokKFuPu1dQERW7Urj7

Leave a Comment

error: Content is protected !!