Agriculture News : पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट! मिरचीचे पीक जगवण्यासाठी शेतकरी पाजतोय बाटलीने पाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture News : सध्या राज्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे काही शेतकरी तर पिकांना तांब्याने काही, बॉटलने तर काही शेतकरी टॅंकरने पाणी देऊ लागले आहेत. फळबाग जगवण्यासाठी शेतकरी टॅंकरने विकत पाणी घेऊन फळबाग जगवत आहेत. दरम्यान धाराशिव जिल्ह्यात पाऊस नसल्याने त्या ठिकाणचे शेतकरी देखील चिंतेत आहेत. या ठिकाणचे शेतकरी पिक वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत.

धाराशिव तालुक्यातील बावी येथील राठोड कुटुंबीय आपल्या शेतातील मिरची वाचवण्यासाठी पाण्याच्या बाटल्यातून पिकांना पाणी पाजत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे बाटलीने पाणी घालून मिरची वाचविण्याचा शेतकरी किलवाना प्रयत्न करत आहेत. थोड्याशा पाण्याने पिकांना नक्की दिलासा मिळेल. मात्र अजून काही दिवसात पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांचे जीवन अवघड असल्याचं चित्र दिसत आहे.

सरकारने मदत करावी – शेतकऱ्यांची मागणी

मागच्या काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप पिक वाया जाण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी तर पिके जळून खाक झाली आहेत. तर काही ठिकाणी पिके सुकली आहेत. त्यामुळे सरकारने याची लवकरात लवकर दखल घेऊन दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत.

हळद पिकावर पांढरे चट्टे – शेतकरी चिंतेत

नांदेडमध्ये हळदीचे पीक जास्त प्रमाणात घेतली जाते. दरम्यान, या पिकावर पांढरे चट्टे पडायला सुरुवात झाली असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पानाला चित्र देखील पडत आहेत. त्यामुळे हळदीची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा नेमका कोणता रोग आहे? याबाबत शेतकऱ्यांना कोणतीच माहिती नाही. त्यामुळे जिल्हा कृषी विभागाने याबाबत मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पाऊस कधी पडणार?

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या भागामध्ये पाऊस कधी पडणार? याबाबतची माहिती जाणून घ्यायची असेल तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावांमध्ये तसेच जिल्ह्यामध्ये कधी पाऊस पडणार याबाबतची माहिती मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा यासोबत तुम्ही या ॲपच्या माध्यमातून सरकारी योजना, खरेदी विक्री, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा, शेतमालाचे बाजारभाव इत्यादी गोष्टींची माहिती अगदी मोफत मिळवू शकता.

error: Content is protected !!