Business Idea : पाॅली हाऊस उभारुन वर्षाला 10 लाख रुपये कमावतोय शेतकरी; जाणुन घ्या कसं ते

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, असे अनेक शेतकरी आहेत जे आपल्या अडचणींवर मात करीत नवीन काहीतरी करून नफा कमवतात आजच्या लेखात आपण अशाच एका शेतकऱ्या विषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी शेतीचा आधुनिक मार्ग (Business Idea) स्वीकारला आणि आता ते नफ्याची शेती (Farming) करत आहेत. हरियाणा मधील हिस्सार येथील रहिवासी शेतकरी परविंद्र भाटिया यांच्याकडे शेती म्हणजे तोटा अशीच परिस्थिती होती. मात्र आज ते प्रत्येक वर्षी दहा लाखांचा नफा शेतीमधून कमवत आहेत.

हरियाणा कृषी विद्यापीठ, हिसारच्या शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार परविंद्र यांनी त्यांच्या शेतात पॉली हाऊस (Poly House) बनवले आणि त्यात लाल, पिवळी आणि हिरवी शिमला मिरची उगवली. त्याचबरोबर आंबा, किन्नू, डाळिंब, लिंबू इत्यादींच्या बागा त्यांनी लावल्या आहेत. काकडी, खरबूज आणि टरबूज, विशेषतः उन्हाळ्यासाठी, देखील चांगले उत्पन्न देतात. विशेष म्हणजे झाडे व रोपांना सिंचनासाठी सीपेज पद्धत वापरली जाते . स्थानिक व्यापारी त्यांचा तयार भाजीपाला व फळे खरेदी करतात.

Business-Idea

परविंदर भाटिया यांनी सांगितले की, त्यांच्याकडे २८ एकर जमीन आहे. ते पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेतीही करायचे. गव्हाची लागवड कधी हवामानामुळे तर कधी रोगराईमुळे तोट्याची (Business Idea) ठरत होती. यासोबतच पाण्याचा खर्चही भरमसाठ असल्याने कालव्याचे पाणी व कूपनलिका यातून ते भागवले जात नव्हते. 2004 साली त्यांनी शेतीत नवनवे प्रयोग सुरू केले. त्यासाठी कृषी तज्ज्ञांची भेट घेतली. हरियाणा कृषी विद्यापीठात जाऊन त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि आधी फळे आणि नंतर भाजीपाल्याची लागवड सुरू केली.

नवीन पद्धती, बियाणांचा फायदा (Business Idea)

परविंदर भाटिया म्हणाले की, शेतकऱ्यांनी बाजारपेठेची गरज लक्षात ठेवावी. आपल्या लागवडीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, डिसेंबरमध्ये खरबूजाची लागवड केली जाते, ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात विकली (Business Idea) जाते. त्यावेळी खूप मागणी असते. सध्या ते १८ एकरात बागायती करत असून त्यात चार एकरात पेरू, चार एकरात किन्नू, चार एकरात लिंबू, एक एकरात हंगामी, मनुका, खजूर आदींची लागवड करत आहेत. तीन एकरात पॉली हाऊस बांधण्यात आले असून त्यात शिमला मिरची लागवड करण्यात आली आहे.

हजारो लिटर पाण्याची बचत

आपल्या शेतीत कमीत कमी रसायनांचा वापर करणारे परविंद्र पाण्याचीही भरपूर बचत करतात. ठिबक पद्धतीने (Drip Irrigation) सिंचनासाठी त्यांनी शेतात टाकी बनवली आहे. यामध्ये कालव्याचे पाणी गोळा करून त्यातून सिंचन केले जाते. त्यामुळे शेतात पाण्याचा थेंबही वाया जात नाही. याशिवाय पिकांचा दर्जाही चांगला आहे.

error: Content is protected !!