Drought : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी; 5.75 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी तालुके आणि दुष्काळसदृश (Drought) महसूल मंडळांमधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना नियमानुसार परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे. यासाठी आतापर्यंत अनेक मुदतवाढीनंतरही ५ लाख ७५ हजार ५५९ विद्यार्थ्यांची माहिती बोर्डाला प्राप्त झाली आहे. या विद्यार्थ्यांसाठी २८ कोटी रुपयांचा निधी गरजेचा (Drought) असणार आहे. असे सरकारी पातळीवरून सांगितले जात आहे.

माहिती गोळा करण्यात विलंब (Drought In Maharashtra)

राज्यात ४० तालुके दुष्काळ आणि १९८ तालुक्यातील १०२१ महसूल मंडळं दुष्काळसदृश परिस्थितीत आहेत. या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात विलंब झाला आहे. बोर्डाने वारंवार आवाहन केले आणि अनेक मुदतवाढ दिल्या तरीही अद्याप पूर्ण माहिती मिळाली नाही. त्यामुळे आता काही दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.

आतापर्यंत मिळालेली माहिती

इयत्ता दहावी: ३ लाख ३७ हजार ४४ विद्यार्थी
इयत्ता बारावी: २ लाख ३८ हजार ५१५ विद्यार्थी
एकूण: ५ लाख ७५ हजार ५५९ विद्यार्थी

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही लाभ

दुष्काळी भागातील विद्यापीठ आणि महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळणार आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची माहिती उच्च शिक्षण विभागाला सादर केली आहे. दुष्काळी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्यासाठी शासनाने आतापर्यंत ८ कोटी ९० लाख रुपये बोर्डाला दिले आहेत. मात्र, २८ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यासाठी बोर्डाने शासनाला निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

अद्याप विद्यार्थ्यांना लाभ नाही

तरीही, अद्याप कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळालेला नाही. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शुल्क माफ करून द्यावे, अशी मागणी होत आहे. बोर्डाने २०२३-२४ च्या आर्थिक वर्षातील निधी खर्च करण्यास मान्यता देण्यासाठी आणि उर्वरित निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाला पत्र पाठवले आहे. मात्र, या पत्राला अद्याप शासनाकडून उत्तर मिळालेले नाही.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती

ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ हवा आहे त्यांनी आपल्या माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयात संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी आवश्यक ते सर्व कागदपत्रे जमा करावीत. अधिक माहितीसाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाइटला भेट देऊ शकतात.

error: Content is protected !!