Drought : पीक कर्ज वसुलीस स्थगिती, वीज बिलात सूट; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुष्काळग्रस्त (Drought) भागातील शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्याच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली आहे. दुष्काळ आणि दुष्काळसदृश्य परिस्थितीत घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये ही स्थगिती सरकारकडून देण्यात आली आहे. यासोबतच इतर तालुक्यांतील एकूण 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या भागांमध्ये देखील ही स्थगिती राहणार असून, सरकारच्या अन्य सवलती देखील या 1021 महसुली मंडळांना लागू करण्यास राज्य सरकारने (Drought) मंजुरी दिली आहे.

या भागांमध्ये स्थगिती (Drought Postponement of Crop Loan Recovery)

  • नंदुरबार – नंदुरबार तालुका.
  • धुळे – सिंदखेडा तालुका.
  • जळगाव – चाळीसगाव तालुका.
  • बुलढाणा – बुलढाणा आणि लोणार तालुका.
  • जालना – भोकरदन , जालना ,बदनापूर ,अंबड, मंठा तालुका.
  • छत्रपती संभाजीनगर – सोयगाव, छत्रपती संभाजीनगर तालुका.
  • नाशिक – मालेगाव , सिन्नर, येवला तालुका.
  • पुणे – पुरंदर, सासवड , बारामती, शिरूर घोडनदी, दौंड, इंदापूर तालुका.
  • बीड – वडवणी ,धारूर , अंबेजोगाई , तालुका.
  • लातूर – रेणापूर तालुका.
  • धाराशिव – वाशी , धाराशिव , लोहारा तालुका.
  • सोलापूर – बार्शी ,माळशिरस , सांगोला , करमाळा, माढा तालुका.
  • सातारा – वाई , खंडाळा.
  • कोल्हापूर – हातकंगले, गढहिंगलज.
  • सांगली – शिराळा , कडेगाव , खानापूर विटा, मिरज तालुका.

कोणत्या सवलती मिळणार?

  • जमीन महसूलात सूट
  • सहकारी कर्जाचे पुनर्गठन
  • शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती
  • कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट
  • शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी
  • रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
  • आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर
  • टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे

दरम्यान, राज्य सरकारने 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ (Drought) जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा शासन आदेश राज्य सरकारने याआधीच जाहीर केला आहे. यात राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यामध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर झाला आहे. ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के कमी पाऊस झाला, त्या भागामध्ये हा दुष्काळ जाहीर केला गेला आहे. तसेच आता या दुष्काळी भागामध्ये उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचे देखील निर्देश सरकारकडून देण्यात आले आहे.

error: Content is protected !!