हॅलो कृषी । नदीकाठावरील जमीन केवळ बिहार आणि उत्तर प्रदेशच नव्हे तर देशातील सर्व प्रदेशांसाठी कधीच फायदेशीर ठरली नाही असा रेकॉर्ड सांगते. एकदा नदीचा पूर ओसंडला की, पिकांचे नुकसान होते. त्याचबरोबर वालुकामय मातीमुळे त्या जागेवर चांगले पीक घेता येत नाही. याचा परिणाम म्हणून शेतकरी निराश झाले आहेत. व जे पीक लवकर येईल ते पिक ते घेतात. अशाच धारनेमुळे हजारो शेतकर्यांना पारंपारिक शेती पद्धत करायला भाग पाडले जात आहे. परंतु बिहारमधील मुझफ्फरपूरमधील बडौल गावात राहणाऱ्या 41 वर्षीय लालबाबू साहनी यांनी आपल्या परिश्रमांनी या सर्व समजूती बदलल्या आहेत. कीकर, तीळ आणि घास हे नदीच्या किनारी नेहमीच उगत असत. आता तेथे भाजीपाला पिकवून ते 15 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न कमावत आहेत.
लालबाबू म्हणतात की, त्यांच्या गावातून काही अंतरावर एक जुनी गंडक नदी आहे. प्रथम नदीच्या पोटाची जमीन साफ केली. प्रथम टरबूज आणि खरबूजची लागवड केली. पण, त्याचा फारसा फायदा झाला नाही. आता ते बदलून एकाच शेतात अनेक प्रकारची भाजीपाला लागवड सुरू केली. येथे सर्वात मोठी समस्या म्हणजे, भाजीपाल्याला वेळेवर पाणी देणे ही आहे. कारण की, प्रत्येक चौथ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी पाणी सिंचन करावे लागते. कारण तिथली माती जास्त वेळ पाणी धरून ठेवत नाही.
लालबाबू दरवर्षी 10 ते 15 लाखांची कमाई करतात. त्यांना सौर बोट माउंट सिंचन प्रणालीचा बराच फायदा होत आहे. डिझेलमधील पैसे वाचवले गेले आहेत. म्हणूनच उत्पन्न वाढले आहे. नापीक जमिनीत हजारो एकर भाजीपाला पिकविला जात आहे. येथून भाजीपाला उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या बाजारात पोहोचतो. पण आता किंमत कमी होत आहे. आता इथल्या वांझ जमिनीत हिरवळ दिसू लागली आहे. साहनी आपल्या शेतीबद्दल सांगतात की, यावेळी त्यांना घीयाचे एक अद्भुत पीक मिळाले आहे. ज्याचे दररोज 5 क्विंटलपर्यंत उत्पादन होते. याबरोबरच, कारलेही लावले आहे. ते एक ते दोन क्विंटल होते. काकडीचे पीक चांगले आहे. दोन क्विंटलपर्यन्त त्याचे उत्पादन होते. मिर्चीलाही प्रति किलो 20 ते 30 रुपये भाव आहे. वांगीही आता चांगली कमाई करत आहे. यामुळे मोठे उदाहरण यांनी या भागातील शेतकऱ्यांना दिले आहे.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा