Farmers Protest : नवीन सरकार येईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; शेतकरी संघटनांचा आक्रमक पवित्रा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दोनच दिवसांपूर्वी देशातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम (Farmers Protest) जाहीर करण्यात आला आहे. ज्यामुळे देशभरात आचारसंहिता लागू झाली असून, सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या पुढील वाटचालीबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशातच शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी माध्यमांसमोर येत शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे. देशात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत शेतकऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी सुरु असलेले आंदोलन (Farmers Protest) सुरूच राहणार आहे. त्यानंतर नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणखी आक्रमक पवित्रा घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

नवीन सरकारसमोर मागण्या मांडणार (Farmers Protest In Delhi)

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उत्तरेकडील राज्यांमध्ये सुरु असलेले शेतकरी आंदोलन (Farmers Protest) थंडावेल. मागील एक महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या खनौरी आणि शंभू बॉर्डरवर हमीभाव कायद्यासह आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. मात्र आता आचारसंहिता लागू झाल्याने सरकारला कोणताही निर्णय घेणे शक्य नसल्याने, शेतकरी संघटना आपले आंदोलन ४ जूनपर्यंत थांबवतील. अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता शेतकरी संघटनांच्या वतीने शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी पुढे येत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत त्या सरकारला विचार करावा लागेल. त्यासाठी शेतकरी आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. असेही त्यांनी म्हटले आहे.

धरणे आंदोलन सुरूच राहणार

शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी म्हटले आहे की, पुढील दोन ते अडीच महिने शेतकरी शंभू आणि खनौरी बॉर्डरवर आंदोलन (Farmers Protest) करतील. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेक शेतकरी संघटनांचे नेते त्या ठिकाणी बसून धरणे आंदोलन सुरू ठेवणार आहे. ज्यामुळे आपल्या मागण्यांबाबत शेतकरी संघटना ठाम असून, देशातील अनेक भागांमधून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. शेतकरी आंदोलनाला विविध कर्मचारी संघटनांचा देखील पाठिंबा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण मागे हटणार नाही. धरणे आंदोलन सुरूच राहील. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर, शेतकरी आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. असेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!